Monday, August 22, 2011

रामलीला मैदान से ये बोलती तस्वीरें...

इन तस्वीरों को शब्दों की जरूरत नहीं है। ये अपना संदेश स्वयं ही स्पष्ट करती हैं। देखिए रामलीला मैदान से ये बोलती तस्वीरें... 

 
 

 
 

 

 

 

 

 

 
 

 

 
 

 
 

 
 

 

 

Wednesday, August 10, 2011

पुरुषोत्तम खेडेकर आणि...


प्रा. हरी नरके
पुरुषोत्तम खेडेकर आणि त्यांचे कार्यकर्ते विविध आंदोलनांमुळे प्रसिद्धीच्या झोतात आले. खेडेकर केवळ आंदोलनं करून थांबले नाहीत तर त्यांनी विविध पुस्तकांमधून आंदोलनाएवढय़ाच कडवट टीकेचं सत्र कायम राखलं आहे. खेडेकरांच्या साहित्याचे सोशिओ कल्चरल ऑडिट करण्याचा हा एक प्रयत्न आहे. आपण कुणालाही उत्तरदायी नाही, असे मानणाऱ्या नेतृत्वाच्या प्रवासाचा आलेख यातून आपल्याला मिळू शकतो.

(भाग २)
फुले-अांबेडकरी चळवळी कब्जात घेण्याचा खेडेकरांचा एक 'ब्लूिपट्र' आहे. त्यांचा हा छुपा अजेंडा विवेकी कार्यकर्त्यांना सहज ओळखता येतो. स्वत:चे मनोगत ते नकळत सांगून जातात. ''असे कलाकार स्वत:चा माल खपवण्यासाठी बहुजन समाजाच्या मालासोबत आपल्या मालाची भेसळ करतात. धान्य, तेल, खाद्यपदार्थ, तूप, मसाले अशा खाद्यपदार्थाच्या भेसळीपेक्षा विचारांची भेसळ अत्यंत घातक असते. असे नाटकी कलाकार अत्यंत क्रूर असतात व या क्रूरपणाशी प्रामाणिक असतात. हा अत्यंत हलकट क्रूरपणा हाच अशा नाटकी लोकांचा स्वार्थी स्वभाव झालेला असतो. त्यामुळे नाना प्रकारची नाटकं निर्माण करून असे कलाकार श्रोत्यांना झुलवतात, पेटवतात, त्यांच्याशी समरस होतात.'' (बहुजनांच्या सत्तांतराचा संघर्ष, पृ. ६)
मुळात खेडेकरांनी ही टीका समरसतावाद्यांवर केलेली आहे. तथापि ती खेडेकरांनाही चपखलपणे लागू पडते. खेडेकर सांगतात, ''प्रतिचळवळी ओळखणे अत्यंत अवघड असते. तसेच अनेकदा तिची ओळख होईपर्यंत ती आपल्याच चळवळींवर स्वार झालेली असते.. प्रतिचळवळी या मूळ चळवळी संपवण्यासाठी असतात. प्रतिचळवळ अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने, निर्दयपणे, सातत्याने, संघटितपणे, निराश न होता राबविली जाते.. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद ही नीती अमलात आणली जाते.. चळवळीत प्रवेश मिळाल्यावर नेतृत्व ताब्यात घेणे व प्रतिचळवळीचा विचार मूळ चळवळीच्या आदर्शाच्या माध्यमातून पसरवणे.. चळवळ हायजॅक केल्यावर म्हणजेच ताब्यात घेतल्यावर तिच्यावर पूर्ण प्रतिचळवळीचा ताबा प्रस्थापित करणे अशी वाटचाल आहे.'' (बहुजनांच्या सत्तांतरांचा संघर्ष, पृ. २६, २७)
संघपरिवार आणि प्रतिगामी शक्तींचे हे डावपेच आहेत असे सांगणारे खेडेकर स्वत:च त्यांचा वापर करताना दिसतात हे पुराव्याने सिद्ध करता येते. इथेच तर चळवळीचा त्यांच्याशी वाद आहे. बहुजन समाजातीलच मराठेतर नेत्यांना संपवण्याचे खेडेकरांचे मनसुबे आहेत. ते लिहितात, ''आम्ही मराठा तितुका मिळवावा आणि गुणदोषांसह स्वीकारावा असे धोरण स्वीकारले आहे.. या संबंधाने आमच्याशिवाय कुणीही चर्चा करायला तयार नाही.. अस्तित्वात असणाऱ्या जातींची अस्मिता जागृत करून बहुजन समाज निर्माण करावा लागतो.. मराठा अस्मिता ही जगातील मानव समूहातील सर्वश्रेष्ठ अस्मिता आहे.. कुणबी मराठा समाज एकसंध असता तर त्यांना बिगर मराठा नेतृत्वाच्या पाठीमागे लाचार होऊन धावण्याची वेळच आली नसती. शिवसेना असो की भाजप, ज्या राजकीय पक्षाचे नेतृत्व बिगर कुणबी मराठय़ांच्या तालाने चालत असते, तिथे कुणबी मराठय़ांचे हित सुरक्षित कसे राहील?'' (कुणबी मराठा समाजाच्या यशाची पंचसूत्री, पृ. ६, २४, २६)

मराठाप्रेमाची साखरपेरणीही बेगडी आहे. मुळात ती एक धोरणीपणाने खेळलेली चाल आहे. स्वत:चे नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी धारण केलेला तो एक मुखवटा आहे.

खेडेकरांची स्पष्ट मागणी आहे की ''मराठय़ांना सरसकट कुणबी संबोधून शासनाच्या ओबीसीमध्ये लागू असलेल्या सर्व शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय इत्यादी सवलती त्वरित द्याव्यात'' (कुणबी मराठा समाजाच्या यशाची पंचसूत्री, पृ. ३३) बहुजनातील छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे, प्रा. हरी नरके यांचा त्याला अडसर होत आहे या समजुतीपोटी खेडेकर त्यांना बहुजनद्रोही व ब्राह्मणांचे हस्तक ठरवून त्यांच्यावर आगपाखड करतात. खेडेकर म्हणतात, ''शिक्षण संस्था व साखर कारखाने मराठा जातीतील लोकांपेक्षा जास्त कुणबी, लेवा कुणबी, माळी, तेली, वंजारी, धनगर, आगरी समाजांच्या ताब्यात आहेत.'' (मराठा आरक्षणाचा खून बापट आयोग, पृ. ५३) प्रत्यक्षात राज्यातील सुमारे ९५ टक्के साखर कारखाने आणि सुमारे ५५ टक्केपेक्षा जास्त शिक्षण संस्था मराठा समाजाच्या ताब्यात आहेत. जे खेडेकर स्वत: कुणबी असूनही कुणब्यांच्याही बाबतीत खोटे लिहितात ते कुऱ्हाडीचा दांडा गोतास काळ नाहीत काय?
खेडेकर म्हणतात, ''मराठा समाजाच्या मनात जातीयता कधीच नव्हती. छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे यांना मराठय़ांनीच भरघोस मतांनी निवडून दिले. हे दोघे व त्यांचे भक्त मराठा समाजाचा द्वेष करतात. मराठा विरोध हे त्यांचे अस्तित्व आहे. ओबीसी, एससी, एसटी व ब्राह्मण संघटित होऊन मराठा समाजाविरोधात अभद्र युती करून सामाजिक विष पेरीत आहेत. मराठा समाजास एकटे पाडून त्यांचा टोकाचा द्वेष करायचा ही भुजबळ, मुंडे यांची राजनीती आहे. ओबीसी समूहातील या जात्यंधांनी मराठा विरोधाची बोथट झालेली धार अत्यंत धारदार बनविली. त्यासाठी फुले-आंबेडकरांचा विचार विकृत बनवला. त्यातून ब्राह्मणालाच एकटे पाडून मुळासकट गाडून टाकण्याचा फुले विचारच गाडण्यात आला. आणि मराठा विरोधालाच समाजात रुजविण्यात आले. यातून 'मराठा विरुद्ध मराठेतर' असा बामणी कावा ओबीसी समाजाने स्वीकारला. 'मराठा तेवढा अडवावा, मातीत पुरून गाडावा', 'मराठा अडवा, मराठा जिरवा' असे नवे नारे जन्मास आले.' (शिवरायांच्या बदनामीची केंद्रे, पृ. ५०, ५१) असा कांगावा खेडेकर करतात.
चोराच्या उलटय़ा बोंबा ही म्हण त्यांना चपखलपणे लागू पडते. खेडेकर ब्राह्मण समाजाची बदनामी करत असतील तर बहुजनांनी कशाला मध्ये पडायचे? असा प्रश्न काही जण विचारतात. वास्तवात ब्राह्मणांना विरोध हा खेडेकरांचा फक्त 'पवित्रा' असला तरी त्यांचा खरा विरोध ओबीसी, दलितांना आहे हे ओळखता आले पाहिजे. प्रगत ब्राह्मण समाज स्वतच्या लढाया लढायला सक्षम आहे. समर्थ आहे. त्यांची वकिली इतरांनी करण्याची गरज नाही. प्रश्न आमच्या दलित-ओबीसींच्या अस्तित्वाचा आहे. भारतीय समाज पुढील चार गटांत विभागला गेला आहे. (१) उच्चवर्णीय ब्राह्मण, भूमीहार, बनिया; (२) सत्ताधारी जाती गुजर, रेड्डी, पटेल, जाट, मराठा; (३) ओबीसी, भटके विमुक्त; (४) दलित अन् आदिवासी. या चार गटांतील सामाजिक विभागणी समजून घेणे, त्यांच्या उत्थानासाठी, हितसंबंधाच्या जपवणुकीसाठी झटणे हा गुन्हा ठरत नाही. तथापि िहदुत्ववादी जसे मुस्लीमविरोधाची आवई उठवून 'िहदू सारा एक' म्हणत असतात आणि दुसरीकडे दलित, ओबीसी, भटके, आदिवासी यांच्या आरक्षण, जातवार जनगणना अशा कार्यक्रमांना विरोधही करीत असतात. त्याच धर्तीवर 'ब्राह्मण आपला शत्रू' असे म्हणत ओबीसींना साथीला घेऊन त्यांच्याच ताटातील घास अलगद काढून घेण्याचा डाव खेडेकर खेळत असतील तर हे राजकारण ओबीसी-दलितांना समजावून सांगणे हे आमचे कर्तव्यच आहे. मॉरिस जोन्सची परिभाषा वापरून सांगायचे तर फुले-आंबेडकरी चळवळीत आज आधुनिकता, परिवर्तन, सदाचार आणि परंपरा यांची गतिशील ऊर्जा कार्यरत आहे. तिला फॅसिझमची कीड लागू द्यायची काय?
खेडेकर सांगतात, ''मराठा जातीपेक्षा गावातील, माळी, वंजारी, तेली निश्चितच श्रीमंत आहेत.. ओबीसींचे सगळे फायदे धूर्तपणे फक्त माळ्यांनीच ओढून नेले.'' (बापट आयोग, पृ. ५०, ५१) यावरचा उपाय म्हणून मुस्लिमांना स्वतंत्र आरक्षण द्यावे, माळ्यांना ओबीसीतून बाहेर काढावे, कुणब्यांना ओबीसीत स्वतंत्र गट बनवून वेगळे आरक्षण द्यावे. अनुसूचित जातीचे सगळे आरक्षण बौद्ध पळवतात. सबब मातंग, चर्मकार, ढोर, भंगी यांचे आरक्षणासाठी स्वतंत्र गट करावेत असे सल्ले खेडेकर देतात. (मराठा आरक्षण बापट आयोग, पृ. ५४) खेडेकरांचा हा कार्यक्रम बहुजन समाजाच्या ऐक्याचा कार्यक्रम आहे काय? मुस्लिमांना वेगळे आरक्षण दिले की िहदुत्चवादी त्यावर तुटून पडतील आणि िहदू-मुस्लीम भांडण लागले की दलित-आदिवासी, ओबीसी-भटके अजेंडय़ावरून आपोआप गायब होतील. हा खेडेकरांचा डाव आहे. ''अत्यंत नीच पातळीवर जाऊन मराठा समाजाची िनदानालस्ती करणारे, स्वत:ला फुले-शाहू-आंबेडकरांचे जिवंत एकमेव वारसदार असल्याचे दावा करणारे हरिभाऊ नरके हे सुमारे गेले चार वर्षे मराठा जातीचा ओबीसीत समावेश करणे कसे अन्यायी आहे यावर राज्यात व राज्याबाहेर भाषणे देत आहेत.'' (मराठा आरक्षण बापट आयोग, पृ. ५३) अशी टीका खेडेकर करतात. मराठा आरक्षणाबाबत घटनात्मक मुद्दे दुबळ्या ओबीसी-भटक्यांना समजावून सांगणे ही हरि नरके यांची कृती मराठा समाजाची िनदा-नालस्ती कशी ठरते ते खेडेकरच जाणोत. घटनात्मक पातळीवरील मतभेद मांडायचे नाहीत काय? मतभेद मांडणे म्हणजे शत्रू होणे असते काय? त्यासाठी ठेचून काढू, संपवून टाकू अशा धमक्या देणे हा चळवळीत साथ देणाऱ्यांचा हा विश्वासघात नाही काय? इथे कुठे आला ब्राह्मण? आम्ही जिवंत राहण्याची धडपड करणे हीही तुम्हाला ब्राह्मणी खेळी वाटत असेल तर ती तुमची गरसमजूत आहे. आमचा मात्र तो हक्क आहे. ब्राह्मणवादी संघटनांच्या अजेंडय़ाशी आम्ही सहमत होणे कदापिही शक्य नाही. आजही त्यांना कुळकायदा रद्द करायचा आहे. आरक्षण आणि जातवार जनगणनेला त्यांचा विरोध आहे. आजही जे ज्ञानगंडाने मातलेले आहेत, परशुराम ज्यांचा आदर्श आहे, हिटलर ज्यांना अनुकरणीय वाटतो, त्यांच्याशी आमची हातमिळवणी होऊ शकत नाही. त्यांचे आणि खेडेकरांचेच एकमत आहे. कारण खेडेकर म्हणतात परशुराम हा मराठा होता. (पृ. ३७) एवढेच नाही तर त्यांचे असेही प्रतिपादन आहे की ''मराठय़ांच्या वीर्यसंकरातून आज जगातील मानववंश वाढलेले आहेत.. वैद्यकीय व शास्त्रीयदृष्टय़ा मराठय़ांचा संकर होऊन निर्माण झालेला आजच्या ब्राह्मण समाजाचा बाप मराठाच आहे हे जगत्सत्य आहे.'' (बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास, पृ. ९७) यावरून मराठा आणि ब्राह्मण हे एकच आहेत आणि त्यांच्यातील भांडणं ही भाऊबंदकीच आहे असे खेडेकरांचे मत आहे. असे असेल तर या भांडणाशी दलित-ओबीसींचा कुठे संबंध येतो?
मराठाप्रेमाची तुमची साखरपेरणीही बेगडी आहे. मुळात ती एक धोरणीपणाने खेळलेली चाल आहे. स्वत:चे नेतृत्व प्रस्थापित करण्यासाठी धारण केलेला तो एक मुखवटा आहे. तुम्हाला जे थारा देत नाहीत ते सारे 'बहुजनविरोधी' या तुमच्या खेळी आता मराठा समाजाच्याही लक्षात येऊ लागल्या आहेत. अण्णा हजारे यांच्याबद्दल सर्वदूर आदरभावना आहे. त्यांच्याशी वैचारिक मतभेद असू शकतात. त्यांच्या कार्यपद्धतीवरही टीका होऊ शकते. परंतु खेडेकर त्यांना चक्क वेडसर ठरवतात. ते म्हणतात, ''मराठा अस्त्र आण्णा हजारे यांच्या हाती लागले. आता या अस्त्राचाही वापर संपत आला आहे. ते आता कोणत्याही क्षणी नेहमीसाठी टाळेबंद होईल आणि प्रसिद्धीचा हव्यास मेंदूत जास्तच भिनला असल्यास एखादे दिवशी आत्महत्या करेल वा अपघातात मरेल!'' (बहुजन हिताय, पृ. ३८) या शब्दात अण्णांच्या मृत्यूची अपेक्षा करणे मराठा धर्माला शोभते काय?

खेडेकरांना वेळीच आवर घातला नाही तर येत्या २० वर्षांत महाराष्ट्रातील मागासवर्गीय समाज हा या फॅसिस्टांचा वेठबिगार बनेल आणि त्यांच्यावर भीक नको पण कुत्रे आवर असे म्हणायची वेळ येईल.

खेडेकरांना पसा न देणाऱ्या मराठय़ांबद्दल खेडेकरांनी किती आगपाखड करावी? ''९० टक्के श्रीमंत-साक्षर, सत्ताधीश, मराठा समाज स्मशानाची वाटचाल करीत आहे. गेल्या २० वर्षांत याच मराठा समाजाने 'मराठा सेवा संघाची' वाट न चालता वाट लावली आहे. हाच समाज प्रामुख्याने ब्राह्मणांचा रक्षणकर्ता बनलेला आहे.'' (शिवरायांच्या बदनामीची केंद्रे, पृ. ४५) ''शिकलेली माणसं जेवढी गांडू-भेकड असतात, तेवढी अशिक्षित नसतात.'' (बहुजनांच्या सत्तांतराचा संघर्ष, पृ. १०) असा शेरा मारून खेडेकर पुढे म्हणतात, ''लता मंगेशकर ही गोवन मराठा कुटुंबातील जगप्रसिद्ध गायिका होताच ब्राह्मणांनी तिचे ब्राह्मणीकरण करून टाकले.'' (पृ. १३) लोकप्रतिनिधींबद्दल खेडेकर म्हणतात, ''आपले लोकप्रतिनिधी न्यायालय म्हटले की, गांडीत शेपूट घालतात, एवढी भारतात न्यायालयांची दहशत आहे.'' (पृ. २०) ''इतर समाजाच्या पावत्या राजरोसपणे फाडणारे आमचे उच्चपदस्थ ढोंगी बांधव, मराठा सेवा संघाचे नाव घेतले की एरंडेल तेल प्यायल्यासारखा चेहरा करतात, याची खंत वाटते.'' (कुणबी मराठा पंचसूत्री, पृ.१७) या सर्व मजकुरावरून काय सिद्ध होते? सबसे बडा रुपय्या! नोकरीत असताना खेडेकरांच्या ठाणे येथील सरकारी बंगल्यावर आयकर विभागाची धाड पडली होती.
खेडेकरांचेच मत आहे की, ''१०० टक्के वैयक्तिक स्वार्थाशिवाय ९९ टक्के मराठा समाज एकत्र येत नाही.'' (पृ. १८) स्वत:च्या वैयक्तिक स्वार्थासाठीच तर हे जातीप्रेमाचे ढोल वाजवले जात आहेत. लोकांचे मतपरिवर्तन करता येत नसेल तर लोकांमध्ये संभ्रम निर्माण करा, हे फॅसिस्ट तत्त्वज्ञानाचे एक महत्त्वाचे सूत्र असते. अफवा, कुजबूज तंत्र, उलटसुलट विधाने, धरसोड आणि घुमजाव ही सगळी फॅसिस्टांची वैशिष्टय़े खेडेकरांच्या पुस्तकात ठासून भरलेली आहेत. एकीकडे खेडेकर एकूण एक ब्राह्मण पुरुष जाळायची आणि कापायची भाषा करतात आणि त्याच वेळी ते आपले हे पुस्तक एका ब्राह्मणालाच अर्पण करतात. सच्चे शिवप्रेमी, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी केलेल्या शिवरायांच्या गौरवपूर्ण सेवेबद्दल त्यांना व इतर चारजणांना सन्मानपूर्वक हे पुस्तक अर्पण करीत असल्याची पानभर नोंद पृ.३ वर खेडेकर करतात. खेडेकर म्हणतात, ''ब्राह्मण अधिकारी मला स्वयंस्फूर्तीने आजही सर्वार्थाने मदत करतात हे मुद्दाम नमूद करतो.'' (पृ.१६) खेडेकरांची संघटना जर ब्राह्मण अधिकाऱ्यांच्या पशावर चालत असेल तर ते कसले ब्राह्मण विरोधक? ब्राह्मण विरोधाची ही निव्वळ आवई उठवून खेडेकर ओबीसी-भटक्यांना फसवू पाहात आहेत. प्रत्यक्षात 'ते ब्राह्मणांना शिव्या देतात हा फार मोठा गरसमज असल्याचीही' कबुली खेडेकरच देतात. पुढे ''ब्राह्मण अधिकारी अरिवद इनामदार व जयंत उमराणीकर यांच्यापासून मराठा अधिकाऱ्यांनी काही शिकावे, त्यात मराठय़ांचेच कल्याण आहे'' असाही सल्ला द्यायला ते विसरत नाहीत (पृ.१६) दुसरीकडे मराठा अधिकारी मात्र खेडेकरांना आíथक मदत करीत नाहीत, अशी त्यांची खरी तक्रार आहे. ''मराठा अधिकाऱ्यांना संघटनेसाठी पसे मागितले तर ते देत नाहीत. परंतु त्याच वेळी अनेकजण हप्ते जमा करण्यात क्रमांक एकवर आहेत.'' (पृ. २०/२१) एवढेच सांगून ते थांबले नाहीत. पुढे ते म्हणतात, ''मराठा संघटनांचा वापर हे मराठा अधिकारी स्वत:चे काळे धंदे लपविण्यासाठी कवच म्हणून करतात.'' (पृ. २१) मराठा अधिकारी काळे धंदे करतात, हप्ते घेतात हा खेडेकरांचा जाहीर आरोप आहे. मराठा अधिकाऱ्यांना तो मान्य आहे काय? खेडेकरांची संघटनाच या काळ्या धंद्यांना संरक्षण पुरवते असा कबुलीजबाब ते देऊन जातात. लेखक विश्वास पाटील यांना खेडेकरांनी मराठा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद दिले होते. पाटील त्यापूर्वी संघपरिवाराच्या समरसता मंचच्या साहित्य संमेलनाचेही अध्यक्ष होते. खास मर्जीतील असूनही खेडेकरांनी पाटलांवर टीकेची झोड उठवलेली आहे. त्यांना चक्क शिवरायांचे विरोधक ठरवले आहे. संभाजी राजांवर महाकादंबरी लिहिणारे विश्वासराव शिवरायविरोधी कसे, हा प्रश्न विश्वास भक्तांना पडू शकेल. तथापि खेडेकरांच्या तोफेपुढे कुणाचीही खैर नाही. ''विश्वास पाटील, भुजंगराव िशदे, प्रताप दीघावकर, शामसुंदर िशदे, ज्ञानेश्वर फडतरे, रवींद्र िशदे, विश्वास भोसले हे सारे मराठा अधिकारी अत्यंत मतलबी व शिवरायविरोधी आहेत. मराठा अधिकारी नोकरी, कमाई, पोस्टिंग, प्रमोशन, स्वार्थ अशा बाबींसाठी 'मराठा' जातीचे दाखवून सर्वच पातळ्यांवर सर्वच फायदे घेत आहेत. दुर्दैवाने अपवाद वगळता कुणीही समाजासाठी व स्वत:च्याच रक्ताच्या नात्यातील नातेवाईकांसाठी उष्टय़ा हाताने कावळाही मारीत नाहीत अथवा फुकट कुणाच्या करंगळीवर मुतत नाहीत.'' (पृ.१६) असा दावा ते करतात. मराठा समाजातील सर्व मंडळींना मराठापणाचा लाभ मिळतो. खेडेकर याबाबतची स्पष्ट कबुली देताना म्हणतात, ''आज जे जे मराठे कोणत्याही पदावर पोहोचलेले दिसतात, त्यात ते मराठा असल्याचा वाटाच सर्वात मोठा आहे!'' ( पृ.३२) ''केवळ मराठा याच एकमेव गुणवत्तेवर जन्मभर नोकरी करणारे अधिकारी कधी कुणाच्या कल्याणासाठी कुणाच्या करंगळीवर मुतेलेले नाहीत'' असे नमूद करून खेडेकर पुढे असेही म्हणतात की, ''अनेक मराठा ज्येष्ठ आयएएस व आयपीएस अधिकारी शब्दातून सहानुभूती दाखवतात. माझा बाप मेल्यासारखे माझे सांत्वन करतात, पण प्रत्यक्ष आíथक व इतर सहभाग शून्य!'' या सगळ्याचा अर्थ एवढाच आहे की खेडेकरांना ही मंडळी पूर्वीसारखी आजकाल पुरेशी आíथक मदत करीत नाहीत. जे खेडेकरांना व्यक्तिगत मानसन्मान देतात, भरघोस अर्थसहाय्य पुरवितात तेच तेवढे ''सच्चे शिवप्रेमी! सच्चे मराठे! बाकी सारे खराटे!'' असे खेडेकरच म्हणतात. (पृ. २५) 'खेडेकरप्रेम म्हणजेच शिवप्रेम! खेडेकर म्हणजेच समाज' असे समीकरणच पुस्तकांच्या पानापानांवर मांडले गेले आहे. 'खेडेकर साहब अंगार है, बाकी सब भंगार है!' अशी त्यांच्या अनुयायांची घोषणाच असते. हे अनुयायी खेडेकरांना युगपुरुष मानतात. त्यामुळे खेडेकर या युगातील कायदे आपल्याला लागू होत नाहीत असे मानतात.
''राजकारणी मराठय़ांना शिवाजी हे निवडणुकीत विजय मिळवून देणारे पात्र वाटत नाही.'' (पृ.३१) असे खेडेकर सांगतात. इतर कुणाची महाराजांना 'पात्र' म्हणायची हिंमत झाली नसती. खेडेकरांचे महाराजांवर 'विशेष' प्रेम असल्याने त्यांना तो अधिकारच असणार. खेडेकरांनी शिवरायांचा अपमान केला म्हणून त्यांच्यावर आक्षेप घेण्याची कोणाचीही प्राज्ञा नाही. मराठा राजकीय नेत्यांवर खेडेकरांचा भलताच 'जीव' असावा! त्यांच्यावर तोंडसुख घेताना खेडेकरांनी त्यांना लावलेली विशेषणे, त्यांचे केलेले गुणवर्णन मुळातूनच वाचायला हवे. खेडेकर म्हणतात, ''शिवाजीराव देशमुख, आर.आर. पाटील, पतंगराव कदम हे व इतर सर्वच मराठा नेते आजही शिवरायांना 'अक्करमासे' मानतात. शिवरायांची बदनामी होण्यास जास्त हातभार यांनीच लावला आहे.'' (पृ.३०) बाबासाहेब कुपेकर, दिलीप वळसेपाटील यांच्यावरही खेडेकरांच्या या पुस्तकात प्रखर टीका आहे. हर्षवर्धन पाटील यांच्याबाबतचा पुढील उल्लेख एक नमुना म्हणून बघता येईल. ''विधिमंडळातील शिवरायांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमात हर्षवर्धन पाटील यांनी स्वत:च्या घरचा कार्यक्रम असल्यासारखी स्वतची जाहिरात केली. हे सर्व पाहिल्यावर शिवरायांच्या ऐवजी हर्षवर्धन पाटील यांच्याच पुतळ्याचे अनावरण विधानभवनात करणे योग्य झाले असते, असे सर्वच पाहुण्यांसह उपस्थित हजारो शिवप्रेमी रयतेस वाटले. एवढा निर्लज्जपणा पोसणारे आमचे नेते.'' (पृ.२७) खेडेकर या शब्दांत पाटलांवर तुटून पडतात. पाटलांनी त्यांना केलेल्या आजवरच्या मदतीची अशा प्रकारे ते परतफेड करतात!
''शिवाजी हे सार्वजनिक चावडीसारखे झाले आहेत. फायद्यासाठी प्रत्येकाचेच, पण करण्यासाठी कोणाचेच नाहीत.'' (पृ.२९) अशी तक्रार करून खेडेकर विधिमंडळावर हल्ला करताना राज्याच्या विधिमंडळानेच शिवरायांचा घोर अपमान केलेला आहे असा आरोप करतात. ते म्हणतात, ''महाराष्ट्राचे विधिमंडळ व स्वत: महाराष्ट्र शासनच शिवरायांच्या बदनामीत सहभागी आहेत. हा बेशरमपणाचा कळस आहे. असे विधानमंडळ व शासन संपवण्यासाठी शिवप्रेमींनी विचार करून कृती करावी.'' (पृ.२९, ३०) खेडेकर विधिमंडळाविरुद्ध दंड थोपटतात आणि थेट आव्हान देतात, ''विधिमंडळाने माझ्यावर हक्क भंग टाकावा.'' (पृ.२९) महाराष्ट्र विधिमंडळ हे आव्हान स्वीकारेल काय? असा सामान्यांचा प्रश्न आहे. सार्वभौम विधिमंडळाची प्रतिष्ठा जपली गेली पाहिजे.
गृहमंत्री आर. आर. पाटील यांचा खेडेकरांना 'वरदहस्त' असल्याचे बोलले जाते. तशी लोकभावना आणि मीडियात चर्चा आहे. यासंबंधात काही बिघाड किंवा तणाव निर्माण झाला आहे काय हे समजायला मार्ग नाही. कदाचित 'कात्रज घाट पॉलिसी'ही असेल. या पुस्तकात आर. आर. पाटील यांचे वाभाडे काढण्यात आलेले आहेत. ''दंगा व जाळपोळ केल्याशिवाय पोलीसही समाजाशी चांगुलपणाने वागत नाहीत. त्यांना लाथा घालणाऱ्यासमोरच मराठा पोलीस माथा टेकतात. मराठा पोलीस अधिकारी अत्यंत खोटे वागतात. मराठा पोलीस कार्यकर्त्यांचा विश्वासघात करतात. अत्यंत घातक व फसवा माणूस एचएमव्ही पोपटलाल आर. आर. पाटील आहे. गाडगेबाबांचा फसवा चेहरा वापरून सर्वच फसव्या व असामाजिक भानगडीत एचएमव्ही पोपटलाल आर. आर. पाटील अग्रेसर आहे. एक नंबरचा ढोंगी माणूस याला साथ देऊन मराठा समाजाचे अनंत नुकसान करणारे मराठा पोलीस मराठा समाजाचे सर्वात मोठे शत्रू आहेत.'' (पृ.२२, २३) अशी आगपाखड करून खेडेकर म्हणतात, ''हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट येथे जेम्स लेन प्रकरणात सरकार पराभूत होण्यास एकच व्यक्ती जबाबदार आहे, ती म्हणजे पोपटलाल आर. आर. पाटील. अशा ढोंगी आर. आर.सारख्या नालायकांना आम्ही भरचौकात नंगे करू शकत नाही, हीच मराठा समाजाची खरी खंत आहे.'' (पृ.१३) आर. आर. पाटील व सांगली जिल्ह्य़ातील इतर मंत्र्यांवर खेडेकरांचा आणखी एक गंभीर आरोप आहे, ''आय.एस.आय., तालिबान, नक्षलवादी, माओवादी, एलटीटीई अशा क्रूर संघटनांपेक्षा महाभयानक असणाऱ्या, ज्याच्यावर तडीपारीचे अनेक गुन्हे आहेत अशा सांगलीच्या मनोहर ऊर्फ संभाजी भिडेला आर. आर. पाटील गुरू मानतात. सांगलीतील सर्वच प्रमुख मंत्री, राज्यकर्ते, श्रीमंत व सत्ताधीश मराठे जाहीरपणे भिडेच्या पायावर डोके ठेवतात.'' (पृ.५३) आर. आर. पाटील यांच्यावर संभाजी ब्रिगेडचे उपकार आहेत अशी जाहीर भूमिका खेडेकर घेतात. ते म्हणतात, ''संभाजी ब्रिगेडने आबांना जागतिक उंची दिली. भांडारकरला अज्ञानातून भेट देऊन झालेली चूक आबांनी पुढे जमेल तशी सुधारली आणि महाराष्ट्रात व केंद्रात शासनव्यवस्थेत वाटेकरी झाले. हे त्यांच्यावर संभाजी ब्रिगेडचे उपकार आहेत.'' (प्रसारमाध्यमातील दहशतवाद, पृ.१५) हे सगळेच आरोप अतिशय गंभीर आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांवर ते करण्यात आलेले असल्याने त्याबाबतची वस्तुस्थिती जनतेला कळेल काय?
महाराष्ट्रात मराठा व कुणबी समाजाची एकत्रित लोकसंख्या ३० ते ३१ टक्के असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. त्यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत फार मोलाचे योगदान आहे. या कर्तबगार समाजाचे प्रबोधन करण्यासाठी कोणी पुढे येत असेल आणि त्यांना आपले सहकार्य हवे असेल तर ते देऊ केले पाहिजे या भावनेने मी स्वत: गेली अनेक वर्षे खेडेकरांच्या संघटनांच्या स्टेजवर गेलो आहे. 'जातीयवादी संघटनांच्या कार्यक्रमाला जाऊ नये' अशी भूमिका असूनही 'मराठा समाजाचे प्रबोधन महाराष्ट्राच्या भल्यासाठी अनिवार्य असल्याच्या भावनेपोटी' मी हा अपवाद केलेला होता. त्यापायी पुरोगामी चळवळीतील अनेक विचारवंत आणि नेत्यांकडून बोलणीही खाल्ली होती. मात्र मी या संघटनांचा किंवा वामन मेश्रामांच्या बामसेफचा कधीही सदस्य नव्हतो. त्यांच्या संघटनात्मक कामकाजात माझा कधीही सहभाग नव्हता. या मंडळींनी कधी प्रवासखर्च दिला तर ठीक, नाहीतर स्वखर्चाने मी त्यांच्यासाठी व्याख्याने दिली आहेत. मानधनाचा तर कधी सवालच नव्हता. मी उदरनिर्वाहासाठी त्यांच्यावर कधीही अवलंबून नव्हतो. अन्यथा लाचार आणि हीनदीन बनावे लागले असते. जसजशी ताकद वाढत गेली तसतसे खेडेकरांचे रूप पालटत गेले. ते आणि मेश्राम एकत्र आले. दोघांचाही खाक्या एकचालकानुवíतत्वाचा. सुलभीकरण, आक्रमकता, प्रेषितपणाचा साक्षात्कार, िथकटँकमधील सहकाऱ्यांना कस्पटासमान मानणे, विचारवंत, अभ्यासकांची मुद्दाम टिंगल करणे याचा या दोघांनी धडाकाच लावला. दादोजी कोंडदेव आणि भांडारकर प्रकरणाच्या प्रसिद्धीची हवा आणि 'मूलनिवासी नायक' या वृत्तपत्राची भडक पत्रकारिता यांच्या जोरावर आकाशात भरारी घेणाऱ्या या दोघांनी बहुजन समाजातील ओबीसी समाज घटकांना वाऱ्यावर सोडून द्यायचा निर्णय घेतला. मराठा आरक्षणाचा विषय ओबीसी-भटके विमुक्त समाजातील कोणीही कार्यकर्ते, अभ्यासकांना विश्वासात न घेता अचानक आणला गेला. आक्रमकपणे हा अजेंडा 'एकमेव' म्हणून राबवायला सुरुवात झाली. बहुजन समाजाच्या नावावर मिळालेली राजकीय सत्ता एकाच जातीच्या हाती एकवटलेली असताना, ओबीसी आरक्षणातून ओबीसींच्या ताटात पडलेला पंचायत राज्यातील राजकीय सत्तेचा पहिलावहिला घासही पळविण्याची पद्धतशीर मोहीम आखण्यात आली. सगळे ओबीसी-भटके विमुक्त कार्यकर्ते भयभीत झाले. अशा प्रकारे बहुजनांमध्ये पहिली फूट खेडेकर-मेश्रामांनी पाडली. आरक्षण हा प्रतिनिधित्व देण्याचा, सामाजिक न्यायाचा कार्यक्रम असताना या दोघांनी त्याला 'गरिबी हटाव'चा कार्यक्रम बनवला. हे वर्तन घटनाविरोधी होते. खेडेकरांच्या शिवराज्य पार्टीने विधानसभा निवडणुकीत उभ्या केलेल्या सर्व उमेदवारांची डिपॉझिटे जप्त झाली. त्यामुळे 'बहुजन समाज म्हणजे हागणदारी' अशी टीका खेडेकर करू लागले. बहुजनातले महापंडित शरद पाटील, डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. रावसाहेब कसबे, लक्ष्मण गायकवाड अशा अनेकांना जाहीरपणे अपमानित करण्यातच त्यांना पराक्रम वाटू लागला. 'मराठा म्हणजे जे ब्राह्मण नाहीत ते सर्व' (बहुजन हिताय, पृ. ७) असे म्हणणारे खेडेकर अचानक छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे अशा बहुजन नेत्यांना विषमतावादी, ब्राह्मणांचे हस्तक असे म्हणून हिणवू लागले. सर्व मराठेतरांना टार्गेट करण्याचा सपाटा लावण्यात आला. फुले-आंबेडकरी चळवळ म्हणजेच मराठा सेवा संघ आणि सेवा संघ म्हणजेच चळवळ, असे समीकरण बनविण्यात आले. (बहुजन हिताय, पृ. ८) मराठा व कुणबी, बहुजन, फुले-अांबेडकरवाद हा सगळा आपला मतदारसंघ आहे असे मानणाऱ्या खेडेकरांनी पुढे मराठेतरांचे खच्चीकरण सुरू केले. या मतदारसंघातून संभाव्य स्पर्धकांची हकालपट्टी करण्याचे मनसुबे रचण्यात आले.
मुस्लीम जातीयवादी आणि धर्माध नेत्यांची (मुल्ला मौलवींची) संघपरिवाराशी, िहदुत्ववाद्यांशी युती आहे असे खेडेकरांचे प्रतिपादन आहे. (बहुजन हिताय, पृ. १७) बहुजन िहदूंच्या मनात असुरक्षिततेचे वातावरण तयार करण्याचे काम या दोघांच्या संगनमताने केले जाते असा खेडेकरांचा आरोप आहे. दुसरीकडे आमचा अनुभवही असाच आहे की, खेडेकरांनी 'सरसकट सब घोडे बारा टक्के' या पद्धतीने संघाऐवजी सर्वच ब्राह्मणांना टार्गेट करायला सुरुवात केली. शिवीगाळ, हल्ले आणि दणक्यांचे उदात्तीकरण सुरू झाले आणि तिकडे ब्राह्मण अधिवेशनांची गर्दी वाढू लागली. इकडे चिकित्सा, वादविवाद, चर्चा याऐवजी दमबाजी, अरेरावी, कमरेखालची भाषा यांनाच अग्रक्रम मिळू लागला. अशा स्थितीत या मंडळींच्या कार्यक्रमांना जाणे अशोक राणा, गणेश हलकारे, रावसाहेब कसबे, डॉ. आ. ह. साळुंखे आदींना बंद करणे क्रमप्राप्त झाले. साळुंखे सरांनी तर जाहीरपणे संबंध तोडले. यातून या फॅसिस्ट शक्तींनी बहुजनात स्पष्ट विभाजनच घडवून आणले. ओबीसी-भटके विमुक्त यांना आणि विवेकी मराठा व कुणबी समाजालाही खेडेकर-मेश्रामांपासून फारकत घेणे अनिवार्य बनले. स्वनेतृत्वाच्या प्रस्थापनेसाठी कत्तली व दंगलींचा त्यांचा विद्यमान अजेंडा बघून बहुजन चळवळ अचंबित झाली. त्यांचा आजवरचा हा छुपा अजेंडा आता स्पष्टपणे उघडा पडलाय. शिवधर्म, शिवराज्य पार्टी, भारत मुक्ती मोर्चा यातून राजकीय सत्ता मिळविण्यासाठी आक्रमकता, त्यासाठी कत्तली, दंगलींचे समर्थन असा हा प्रवास सुरू आहे. सत्यशोधक चळवळीचे ब्राह्मणेतर चळवळीच्या काळातील पतन ज्यांना माहीत आहे, त्यांनी इतिहासातून काहीतरी शिकले पाहिजे. असल्या आततायी, अतिरेकी आणि आत्मघातकी डावपेचांनी बहुजन चळवळ बदनाम होते, क्षीण होते हे लक्षात घेतले पाहिजे. बहुजनांचे विभाजन करणारे हे राजकारण नाकारले पाहिजे. फॅसिस्ट शक्ती कृतघ्न, खुनशी आणि व्यक्तिगत वैमनस्य बाळगणाऱ्या असतात.
खेडेकरांना वेळीच आवर घातला नाही तर येत्या २० वर्षांत महाराष्ट्रातील मागासवर्गीय समाज हा या फॅसिस्टांचा वेठबिगार बनेल आणि त्यांच्यावर भीक नको पण कुत्रे आवर असे म्हणायची वेळ येईल.
मार्टीन निमोलर नावाच्या जर्मन कवीची एक मौलिक कविता आहे. हिटलरच्या नाझी सनिकांनी जेव्हा उच्छाद मांडला होता तेव्हाची. निमोलर म्हणतो, ''जेव्हा नाझी कम्युनिस्टांसाठी आले तेव्हा मी शांत राहिलो, कारण मी कम्युनिस्ट नव्हतो. जेव्हा त्यांनी येऊन समाजवाद्यांना पकडले तेव्हा मी गप्प राहिलो, कारण मी काही समाजवादी नव्हतो. जेव्हा ते कामगार नेत्यांना घेऊन जात होते तेव्हा मी चूप होतो, कारण मी काही कामगार नेता नव्हतो. जेव्हा ते ज्यूसाठी आले तेव्हाही मी चूपच होतो, कारण मी काही ज्यू नव्हतो. जेव्हा ते आले आणि त्यांनी मलाच पकडले तेव्हा माझ्या मदतीला यायला कोणीही शिल्लक नव्हते.''
तेव्हा अशी वेळ चळवळींवर यायची नसेल तर गडय़ा आपली फुले-आंबेडकरी लोकशाहीच बरी! हिटलर आपल्याला परवडणारा नाही. दुरून डोंगर साजरे! हिटलर हा शुद्ध रक्त, वंशश्रेष्ठत्व व आर्यत्व यांचा पुरस्कर्ता होता. फुले-आंबेडकरी चळवळ प्रामुख्याने स्त्री-शुद्र-अतिशुद्रांची (महिला, ओबीसी, भटके विमुक्त, अनुसूचित जाती-जमाती यांची) आहे. तिला हा वंशश्रेष्ठत्वाचा उच्चवर्णीय ताठा परवडणारा नाही. हिटलर हा संघपरिवाराचा आणि खेडेकरांचाही आदर्श असावा यातच सगळे आले!
harinarke@yahoo.co.in

(लेखक पुणे विद्यापीठाच्या महात्मा फुले अध्यासनाचे प्राध्यापक असून ते गेली ३० वर्षे फुले-आंबेडकरी चळवळीत कार्यरत आहेत. त्यांची या विषयावरील आजवर ३५ पुस्तके प्रकाशित झाली आहेत.)

पुरुषोत्तम खेडेकर - नेतृत्वाच्या प्रवासाचा आलेख


प्रा. हरी नरके
भांडारकर इन्स्टिटय़ूटवरील हल्ला, दैनिक लोकसत्ता, दैनिक लोकमत यांच्यावरील हल्ले, पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेवांचा पुतळा हलविणे, रायगडावरील शिवस्मारकासमोरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटविण्याचे अांदोलन इत्यादींमुळे पुरुषोत्तम खेडेकर आणि त्यांचे कार्यकर्ते प्रसिद्धीच्या झोतात आले. एका ओबीसी नेत्याने खुल्या प्रवर्गातील आणि तेही सत्ताधारी असलेल्या जातीची संघटना उभारण्याची, ती सक्षमपणे चालविण्याची आणि तिला एक 'दादा' संघटना म्हणून नावारूपाला आणण्याची ही घटना समाजशास्त्रीयदृष्टय़ा लक्षणीय होय. खेडेकरांच्या साहित्याचे सोशिओ कल्चरल ऑडिट करण्याचा हा एक प्रयत्न आहे. आपण कुणालाही उत्तरदायी नाही, असे मानणाऱ्या नेतृत्वाच्या प्रवासाचा आलेख यातून आपल्याला मिळू शकतो.

महाराष्ट्राला सामाजिक प्रबोधनासाठी झटणाऱ्या संघटना व कार्यकर्त्यांचे मोहोळ मानले जाते. राज्यात फुले-आंबेडकरी विचारांच्या अनेक संघटना कार्यरत आहेत. सामाजिक न्याय, लोकप्रबोधन, अत्याचार निवारण, शिक्षण, पुनर्वसन आदी क्षेत्रात या संघटना काम करतात. बहुजन समाजातील नानाविध प्रश्न ऐरणीवर आणून काम करणाऱ्या या संघटना विविध समाजघटकांत पाय रोवून उभ्या आहेत. या संघटनांमध्ये मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, बामसेफ, भारत मुक्ती मोर्चा, मुलनिवासी संघ आदींचा बराच बोलबाला आहे.
संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघाचे सर्वेसर्वा पुरुषोत्तम खेडेकर यांच्यावर पुणे पोलिसांनी नुकताच गुन्हा दाखल केला आहे. मराठा समाजातील सामाजिक कार्यकर्ते शाम सातपुते यांनी पोलिसांकडे दिलेल्या लेखी तक्रारीवरून हा एफ.आय.आर. दाखल झाला आहे.
खेडेकरांच्या 'शिवरायांच्या बदनामीची केंद्रे' या पुस्तकात त्यांनी जातीय दंगली व कत्तलींना चिथावणी देणारे लेखन केल्याबद्दल कलम १५३(अ), ५०५(२) व ३४ अन्वये खेडेकर, त्यांचे मुद्रक व प्रकाशक यांच्याविरुद्ध गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
या कलमाखाली एकत्रित मिळून ७ वर्षांपर्यंतचा कारावास होऊ शकतो. ''विविध गटात तेढ अथवा शत्रुत्वाच्या, द्वेषाच्या किंवा दुष्टाव्याच्या भावना वाढविल्यास'' १५३(अ) खाली आणि ''अफवा, भयप्रद वृत्त याद्वारे निरनिराळे धार्मिक, वांशिक, भाषक गट किंवा जाती, समाज यांच्यामध्ये शत्रुत्वाची, द्वेषाची, दुष्टाव्याची निर्मिती होण्याची शक्यता असेल'' तर कलम ५०५(२) खाली गुन्हा दाखल केला जातो.
खेडेकरांचे हे पुस्तक सुमारे ७ महिन्यांपूर्वी (१३ नोव्हे. २०१०) प्रकाशित झाले आहे. जिजाऊ प्रकाशनाचे हे पुस्तक ५५ पानांचे असून त्याची किंमत २५ रुपये आहे. जिजाऊ प्रकाशनाचे हे १५० वे पुस्तक असून खेडेकरांनी आजवर सुमारे ५० पुस्तके किंवा छोटय़ा-छोटय़ा पुस्तिका लिहिलेल्या आहेत.
खेडेकर हे बहुजन समाजातील बाहुबली नेते असून आक्रमक वक्ते आहेत. ते उत्तम संघटक आहेत. त्यांच्यामागे मराठा व कुणबी तरुणांचा मोठा संच आहे. त्यांच्या संघटनेला २० वर्षे पूर्ण झाली असून संघटनेचे काम वेगवेगळ्या ३१ कक्षांद्वारे (सेल) चालते. विदर्भ, मराठवाडय़ात या संघटनेचा चांगला जोर आहे. भांडारकर इन्स्टिटय़ूटवरील हल्ला, दैनिक लोकसत्ता, दैनिक लोकमत यांच्यावरील हल्ले, पुण्याच्या लाल महालातील दादोजी कोंडदेवांचा पुतळा हलविणे, रायगडावरील शिवस्मारकासमोरील वाघ्या कुत्र्याचा पुतळा हटविण्याचे अांदोलन इत्यादींमुळे ते आणि त्यांचे कार्यकर्ते सतत प्रसिद्धीच्या झोतात असतात. या संघटनांचा राज्यात फार मोठा दरारा आहे. त्यांच्या विरोधात 'ब्र' उच्चारायलाही प्रसार माध्यमातील दिग्गज आणि सर्वच राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी घाबरतात. खेडेकर शिवधर्माचे संस्थापक धर्मगुरू आहेत. मुस्लीम खलि ज्याप्रमाणे धर्मसत्ता आणि राजसत्तेचे एकमेव सूत्रधार असत, त्याप्रमाणे सत्ताधारी जातींचे किंगमेकर आणि शिवधर्माचे शंकराचार्य बनण्याची खेडेकरांची महत्त्वाकांक्षा आहे. त्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू आहे. खेडेकरांच्या संघटनेतील 'सेवासंघ' या शब्दाचा अर्थ सामाजिक सेवा अथवा सामाजिक कार्य असा नसून मुळात ती सरकारी अधिकारी व कर्मचारी यांची एकजातीय 'युनियन' आहे. मराठा समाजातील सरकारी नोकरांना बदली, बढती, खाते अंतर्गत चौकशी किंवा शिक्षा या कामी मदत किंवा संरक्षण पुरविण्याचे कार्य ही संघटना करते. संघटनेला कर्मचाऱ्यांकडून फार मोठे आíथक पाठबळ दिले जाते. खेडेकर त्यासाठी 'मराठा टॅक्स' घेतात, असे त्यांनी त्यांच्याच एका पुस्तकात नमूद केले आहे. (पाहा- कुणबी मराठा समाजाच्या यशाची पंचसूत्री, पृष्ठ क्र. १७) अन्य मार्गानीही पसा उभा केला जातो. सरकारी नोकरांच्या अनेक संघटना असल्या तरी थेट जातीच्या नावावर कार्यरत असलेली राज्यातील ही पहिली आणि एकमेव संघटना असावी. खेडेकर स्वत: कार्यकारी अभियंता या पदावरून सार्वजनिक बांधकाम खात्यातून चार वर्षांपूर्वी निवृत्त झालेले आहेत. खेडेकरांना सत्ताधाऱ्यांचा थेट वरदहस्त असल्याची लोकभावना आहे. त्यांच्या 'मराठा मार्ग' या मासिकाच्या एका अंकात त्यांनी आपल्या 'गॉडफादर्सचा' ऋणनिर्देशही केलेला होता. खेडेकर स्वत: जन्माने कुणबी समाजाचे आहेत. हा समाज ओ.बी.सी.मध्ये आहे. त्यांच्या पत्नी सौ. रेखाताई भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आहेत. त्या १५ वर्षे आमदार होत्या. एका ओबीसी नेत्याने खुल्या प्रवर्गातील आणि तेही सत्ताधारी असलेल्या जातीची संघटना उभारण्याची, ती सक्षमपणे चालविण्याची आणि तिला एक 'दादा' संघटना म्हणून नावारूपाला आणण्याची ही घटना समाजशास्त्रीयदृष्टय़ा लक्षणीय होय. त्यातून खेडेकरांचे नेतृत्व आक्रमक, महत्त्वाकांक्षी, जिगरबाज आणि बलदंड असल्याची साक्ष पटते. अशा खेडेकरांच्या साहित्याचे सोशिओ कल्चरल ऑडिट करण्याचा हा एक प्रयत्न आहे. आपण कुणालाही उत्तरदायी (अकाऊंटेबल) नाही, असे मानणाऱ्या नेतृत्वाच्या प्रवासाचा आलेख यातून आपल्याला मिळू शकतो.

ते आणि त्यांचे कार्यकर्ते सतत प्रसिद्धीच्या झोतात असतात. या संघटनांचा राज्यात फार मोठा दरारा आहे. त्यांच्या विरोधात 'ब्र' उच्चारायलाही प्रसार माध्यमातील दिग्गज आणि सर्वच राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी घाबरतात. खेडेकर शिवधर्माचे संस्थापक धर्मगुरू आहेत.

खेडेकर आपल्या पुस्तकात स्पष्टपणे म्हणतात, ''हिटलरशाहीप्रमाणेच प्रतिज्ञा मराठा व बहुजनांच्या मनावर कोरावी लागेल.'' (शिवरायांच्या बदनामीची केंद्रे, पृ. ५५) अशा प्रकारे आपला आदर्श हिटलर असल्याची जाहीर कबुली ते देतात. ज्यूंच्या कत्तली करणारा हिटलर हा त्यांचा आदर्श असल्यामुळेच ते म्हणतात, ''विचारांच्या लढाईला दणक्यांची जोड पाहिजेच, म्हणून भांडारकर तो झाँकी है! या संभाजी ब्रिगेडने दिलेल्या नाऱ्याचा अर्थ समजून घ्या.'' (बहुजनांच्या सत्तांतराचा संघर्ष, पृ. ३१) खेडेकर पुढे असेही म्हणतात, ''लोकसत्ताचे कार्यालय फोडणे, तोडणे याचे आम्ही पूर्णपणे समर्थन करतो.'' (प्रसार माध्यमातील दहशतवाद, पृ. ११) आपण फुले-आंबेडकरवादी असल्याचाही दावा खेडेकर करीत असतात. (शिवधर्म प्रेरणा व ब्राह्मण जेम्स लेन, पृ. १२) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात वावरलेल्या दादासाहेब रूपवते यांचे वकील पुत्र अ‍ॅड. संघराज रूपवते यांच्याबद्दल खेडेकर म्हणतात, ''अ‍ॅड. संघराज रूपवतेंनी आंबेडकरी चळवळ हे नाव वापरून आंबेडकरांच्या मोठेपणाला आपल्या विकृतीची झालर लावू नये. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सार्वजनिक व जागतिक व्यक्तीत्त्व आहे. त्यांचे तत्त्वज्ञान मानवतावादी आहे. ते केवळ महार व नवबौद्धांच्याच मालकीसाठी नाही. मराठा सेवा संघाचे कार्यही आंबेडकरवादी आहे. बहुजन विघटनाला वा विकृतीला आंबेडकरांनी मान्यता दिलेली नाही. अ‍ॅॅड. रूपवते यांनी आपली विकृती बाबासाहेबांच्या वटवृक्षाखाली लपवू नये. त्यांनी जेम्स लेनचे हे पुस्तक पूर्णपणे वाचले आहे. पारायणे केली आहेत. त्यांनी आपल्या व्यवसायास व आदर्शास स्मरून कोणते अगाध ज्ञान प्राप्त केले त्याचा हिशोब आम्हा आंबेडकरवाद्यांसमोर प्रामाणिकपणे मांडावा.'' (शिवधर्म प्रेरणा, पृ.११, १२) यातून ते आणि त्यांची संघटना आंबेडकरवादी असल्याचा खेडेकरांचा दावा स्पष्ट होतो. खेडेकर एक व्यक्ती म्हणून व त्यांची संघटना एक स्वतंत्र संघटना म्हणून काय करतात याच्याशी आम्हाला फारसे देणेघेणे नाही. मात्र अांबेडकरवादी खेडेकर आणि अांबेडकरवादी मराठा सेवा संघ जर काही लिहीत असतील, कृती करीत असतील आणि त्या जर अांबेडकरवादाच्या विपरीत असतील तर त्याची दखल घेऊन त्याचे अॉडिट करणे आम्हा चळवळवाल्यांचे कर्तव्य बनते.
हिटलर आणि फुले-आंबेडकर यांना एका पंक्तीत बसविणारे खेडेकर खैरलांजी हत्याकांडाबाबत म्हणतात, ''गावागावात मराठा समाजच दलितांवर अत्याचार करतो, असे चित्र निर्माण करण्यासाठी भंडारा जिल्ह्य़ातील खैरलांजी प्रकरणाला अत्यंत विकृत स्वरूप दिले गेले. आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या धंदेवाईक एनजीओंनी हे प्रकरण जाणीवपूर्वक पेटविले. त्यातून मराठा व दलित हे एकमेकांचे शत्रू म्हणून उभे करण्यात ब्राह्मणी रामदासी यंत्रणा यशस्वी झाली.'' (शिवरायांच्या बदनामीची केंद्रे, पृ. ४९) खैरलांजीत भय्यालाल भोतमांगे या बौद्धाचा वंशसंहार झाला. त्यांची दोन तरणीबांड मुले, एक मुलगी व पत्नी यांना जमावाने क्रूरपणे ठार मारले. सारा देश ज्या घटनेने हादरला, संपूर्ण बौद्धजगत ज्या घटनेमुळे संतप्त झाले, जगभरचे मानवतावादी न्यायासाठी पुढे आले, त्या अमानुष घटनेकडे पाहण्याचा खेडेकरांचा हा संवेदनाहीन दृष्टिकोन फुले-आंबेडकरवादी आहे काय?
भारतीय संविधानाचे प्रमुख शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख खेडेकर आपल्या 'बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास' या ग्रंथात पुढील जातीवाचक शब्दात करतात, ''महार समाजाने ब्रिटिशांना मदत केली याचा प्रचंड राग बामणांना आहे. पुढे इंग्रज भारतातून गेल्यावर ब्राम्हणांनी गांधी हत्या घडवून आणली. परंतु डॉ. आंबेडकर या महाराने देशाची समतावादी राज्यघटना लिहून ब्राह्मणाच्या हक्क अधिकारावर गंडांतर आणले. म्हणून ब्राह्मणांनी डॉ. आंबेडकरांची हत्या घडवून आणली.'' (बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास, पृ. ४०) या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा मुद्दाम जातीवाचक उल्लेख करण्याची काय गरज होती तेच कळत नाही.

मराठा समाजातील सरकारी नोकरांना बदली, बढती, खाते अंतर्गत चौकशी किंवा शिक्षा या कामी मदत किंवा संरक्षण पुरविण्याचे कार्य ही संघटना करते. संघटनेला कर्मचाऱ्यांकडून फार मोठे आíथक पाठबळ दिले जाते. खेडेकर त्यासाठी 'मराठा टॅक्स' घेतात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना बनविण्यासाठी रक्ताचे पाणी केले. त्यांच्या अपार परिश्रम, विद्वत्ता, तळमळ आणि त्यागातून समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुतेवर आधारलेली घटना देशाला मिळाली. हजारो वर्षे लिहिण्या-वाचण्याची व बोलण्याची बंदी असलेला बहुजन समाजघटनेच्या कलम १९ मधील अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि व्यवसाय स्वातंत्र्याने जागतिक भरारी घेऊ लागला. लोकशाही, शांततामय सहजीवन आणि बुद्धाचा परिवर्तनाचा मार्ग बाबासाहेबांनी दिला. चर्चा आणि चिकित्सा यामुळेच दलित, उपेक्षित, वंचितांचा विकास होऊ शकतो, हा बाबासाहेबांचा विश्वास होता. जेव्हा जेव्हा राष्ट्रीय चर्चा होते तेव्हा तेव्हा त्या चर्चेचा बहुजनांना लाभच होतो असा अनुभव आहे. उदा. मंडल आयोगाच्या विरोधात रान पेटविले गेले. नामांतर, रीडल्स, उच्च शिक्षण संस्थांमधील आरक्षण, जातवार जनगणना यांना विरोध झाला. पण महाचर्चा झडल्या. त्यातून बहुजनांमध्ये जागृतीच्या लाटा उसळल्या. चर्चा म्हणजे जणू बहुजनांचे शक्तिवर्धक टॉनिक होय. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला विरोध करणे म्हणजे बोलते-लिहिते झालेल्या समाजाला पुन्हा मूक बनविणे होय. चर्चा बंद, वादविवाद बंद हा हिटलरीच खाक्या होय. खेडेकर चक्क अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात शड्डू ठोकून उभे राहतात. ते म्हणतात, ''अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे समाज व्यवस्था नाकारणे, देश व गावगाडा नाकारणे, सार्वजनिक ठिकाणी नग्न फिरणे, सार्वजनिक ठिकाणी घाण करणे, सार्वजनिक ठिकाणी नग्न स्त्री-पुरुष एकत्र येऊन संभोग क्रीडा करणे अशा बाबीही अभिव्यक्ती स्वातंत्र्यात येतात. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही मागणी म्हणजे राज्यघटना रद्द ठरवून पुन्हा मनुस्मृतीच लागू करावी या प्रकारची आहे.'' ( शिवरायांच्या बदनामीची केंद्रे, पृ. ४, ८) डॉ. आंबेडकरांच्या या लाडक्या कलमाविरुद्ध कुऱ्हाड चालवणारे खेडेकर 'आंबेडकरवादी' असल्याचे सांगत असतील तर त्यांची कथनी आणि करणी यातील विसंगती चळवळीने ओळखली पाहिजे. मनुस्मृतीने स्त्रिया आणि शूद्रातिशूद्रांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाकारले होते, म्हणूनच ती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जाळली होती. जगातील सर्वश्रेष्ठ मानल्या जाणाऱ्या भारतीय घटनेचे निर्माते असलेले बाबासाहेब स्वीकारणे म्हणजेच अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाजूने उभे राहणे होय. अभिव्यक्ती स्वातंत्र्य हवेच, तथापि त्याचा अतिरेक टाळावा असे खेडेकरांनी म्हटले असते तर समजण्याजोगे होते.

चर्चा म्हणजे जणू बहुजनांचे शक्तिवर्धक टॉनिक होय. अभिव्यक्ती स्वातंत्र्याला विरोध करणे म्हणजे बोलते-लिहिते झालेल्या समाजाला पुन्हा मूक बनविणे होय. चर्चा बंद, वादविवाद बंद हा हिटलरीच खाक्या होय. खेडेकर चक्क अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या विरोधात शड्डू ठोकून उभे राहतात.

राज्यघटनेच्या कलम १७ द्वारे अस्पृश्यता नष्ट करण्यात आली आहे. हजारो वर्षे अस्पृश्यांना अमानवी जीवन जगावे लागले. अन्याय, अत्याचार आणि अपमानाचे चटके सोसावे लागले. कोणीही फुले-आंबेडकरवादी कोणत्याही स्वरूपाच्या अस्पृश्यतेचे समर्थन करूच शकत नाही. खेडेकर आणि त्यांनी स्थापन केलेला 'शिवराज्य पार्टी' हा राजकीय पक्ष अस्पृश्यतेचे उघडपणे समर्थन करतात. ते म्हणतात, ''ब्राह्मणांनी १०० वर्ष अस्पृश्य म्हणून जगावे. बहुजन समाज ब्राह्मणांचा विटाळ पाळेल. विज्ञान युगात हे अमानवी आहे, पण न्यायाचे आहे. ५० वर्षे आमचे उष्टे खा. ब्राह्मणांनी बहुजनांना सुमारे ५००० वर्षे झोडपले. आम्हाला ५०० वर्षे तरी झोडपू द्या.'' (बहुजनांच्या सत्तातरांचा संघर्ष, पृ. ३६) ही मांडणी सनसनाटी आणि चटकदार असली तरी बुद्ध, कबीर, फुले, बाबासाहेब यांच्या विचारात ती बसणारी नाही. दंगली, कत्तली, अस्पृश्यता, विटाळ यांना आधुनिक भारतीय समाजाने थारा देता कामा नये. हा अतिरेकी, दहशतवादी मार्ग बहुजन तरुणांची माथी भडकावूनत्यांना पोलिसांच्या आणि तुरुंगाच्या सापळ्यात अडकवणारा मार्ग आहे. जेम्स लेन या अमेरिकन लेखकाने त्याच्या पुस्तकात राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवराय यांची बदनामी केली आहे. त्याच्या या दुष्टाव्यामुळे सारेच भारतीय दुखावले गेलेत. सर्व भारतीयांच्या भावना दुखावणाऱ्या या नतद्रष्ट माणसाला खेडेकरांनी त्यांचे दादोजी कोंडदेवांवरील पुस्तक अर्पण केले आहे. खेडेकरांनी आपल्या अनेक पुस्तकांमध्ये जेम्स लेनचे आभार मानलेले आहेत, हा प्रकार म्हणजे भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळणे होय. मधुकर रामटेके, संजय सोनवणी, भूपाल पटवर्धन आणि हरी नरके यांनी श्याम सातपुतेंना साथ द्यायचे ठरवले. १८ मे २०११ रोजी आंबेडकरवादी चळवळीचे कट्टर पुरस्कर्ते अशोक धिवरे, सहआयुक्त, पुणे पोलीस यांना भेटून लेखी अर्ज व खेडेकरांच्या 'शिवरायांच्या बदनामीची केंद्रे' या पुस्तकाची प्रत सादर केली. पोलिसांनी योग्य ती छाननी आणि शहानिशा करून सुमारे ३ आठवडय़ांनी खेडेकरांवर गुन्हा दाखल केला. ''प्रशिक्षित मराठा युवकांनी पुढाकार घेऊन देशात धार्मिक व जातीय दंगली घडवून आणल्या पाहिजेत, तरच समाजात सुधारणा, क्रांती व परिवर्तन शक्य आहे. हिटलरशाहीप्रमाणेच ब्राह्मण हाच एकमेव शत्रू व तो नेस्तनाबूत करणे हाच आमचा संकल्प ही प्रतिज्ञा कोरावी लागेल. सर्वच ब्राह्मण पुरुष कापून वा जाळून मारावेच लागतील. महाराष्ट्रासह भारत देश 'निब्र्राह्मण' करावा लागेल. हेच खरे शिवप्रेम, हेच खरे शिवकार्य. आज छत्रपती शिवराय पुन्हा आल्यास हेच कार्य करतील.'' (पृ. ५४, ५५) असा थेट चिथावणीखोर मजकूर खेडेकरांनी लिहिलेला आहे.
२० वर्षांत प्रथमच खेडेकरांना संघटनांतर्गत समर्थक उरलेला नाही. त्यांचे सर्व सहकारी या लेखनाचा निषेध करीत आहेत. संघटनेत उभी फूट पडण्याच्या मार्गावर आहे. जागतिक कीर्तीचे विचारवंत डॉ. आ. ह. साळुंखे यांनी संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, शिवधर्म यांना खतपाणी घालून वाढविले आहे. बामसेफचे वामन मेश्राम आणि खेडेकर यांच्यापासून डॉ. साळुंखे यांना दूर का व्हावे लागले, याचे आत्मपरीक्षण कधी तरी त्या दोघांनी केले पाहिजे. नेत्यांच्या सूरात सूर मिसळूनच बोला, नाही तर शत्रू ठरविले जाईल ही वृत्ती अभ्यासकांना कशी मानवेल? या संघटनांचे 'दै. मूलनिवासी नायक' नावाचे मुखपत्र चालविले जाते. त्यात गेली २ वर्षे प्रा. रावसाहेब कसबे, प्रा. विलास वाघ, प्रा. भालचंद्र मुणगेकर, डॉ. नरेंद्र जाधव, प्रा. दत्ता भगत, उत्तम कांबळे, नामदेव ढसाळ, डॉ. सुखदेव थोरात, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, राजा ढाले, जोगेंद्र कवाडे, छगन भुजबळ, नागनाथ कोतापल्ले, भाई वैद्य, ग. प्र. प्रधान, य. दि. फडके, भालचंद्र फडके, गं. बा. सरदार, नरहर कुरुंदकर, बाळकृष्ण रेणके, डॉ. सदानंद मोरे, प्रा. आ. ह. साळुंखे, प्रा. उषा वाघ, प्रा. अंजली आंबेडकर, डॉ. सविता आंबेडकर आणि इतर अनेकांविरुद्ध मोहीम उघडण्यात आल्या. अत्यंत भडक, धादांत खोटय़ा, चिथावणीखोर आणि विकृत हेडलाइन्स देण्यात आल्या. पानभर मजकूर, अग्रलेख, लेख यांचा भडिमारच करण्यात आला. सगळे वृत्तपत्रीय संकेत पायदळी तुडवून पुन्हा-पुन्हा एकतर्फी अर्धसत्य मजकुरांचा मारा करण्यात आला. कोणाचाही खुलासा छापण्यात आला नाही. फॅॅसिस्ट शक्ती कृतघ्न, खुनशी तसेच व्यक्तिगत वैमनस्य करणाऱ्या असतात, याचा प्रत्यक्ष अनुभव चळवळीतील लोकांना येत गेला. डिवचणाऱ्यांनी डिवचत रहायचे आणि डिवचले जाणाऱ्यांनी गप्प रहावे, अशी अपेक्षा बाळगायची हा प्रकारच क्रूरतेच्या पातळीवर जाणारा आहे. ही कोंडी आणि हे अपमानकारक डिवचणे किती काळ पचवून घ्यायचे? पुस्तिका, पुस्तके, प्रचारपत्रके, उस्मानाबाद, अमरावती, नाशिक येथील खोटय़ा पोलीस तक्रारी यांचा उच्छाद मांडण्यात आला. शेवटी चळवळीतील लोकांच्या सहनशक्तीलाही काही मर्यादा असतात. वारंवार विनवणी करूनही हा भडिमार थांबला नाही. अत्यंत गलिच्छ पत्रे पाठवून आणि खेडेकरांच्या फेसबुकवरील 'शिवराय-फुले-शाहू-आंबेडकर विचारमंच'च्या माध्यमातून बदनामी, धमक्या आणि शिवीगाळीचा वर्षांव चालूच राहिला. शेवटी भारतीय राज्यघटनेने चळवळीतील लोकांनाही आत्मसंरक्षणाचा अधिकार दिलेला आहे.

खेडेकर म्हणतात, ''महाराजांनी रामदासांचे सुमारे सहाशे ब्राह्मण शिवराज्याभिषेकास विरोध करण्यासाठी आले असता उभे कापून काढले. महाराजांनी गोळीबाराचा हुकूम फर्मावला. पटापट शेपाचशे मुडदे पडले. रामदासी संपले. रस्ता मोकळा झाला. राज्याभिषेक समारंभ ब्राह्मण संपल्यावर निर्वघ्निपणे पार पडला.''

चळवळीतील संशोधन आणि साहित्य राजरोसपणे स्वत:च्या नावावर छापायचे, इतरांना सरसकट शिवराय- फुले- शाहू- अांबेडकर- अण्णाभाऊ विरोधी ठरवायचे, अनुयायांकरवी धाकदपटशा दाखवून मनस्ताप द्यायचा, रात्रीबेरात्री फोनवर धमक्या, भाषणांचे विकृतीकरण आणि वैयक्तिक चारित्र्यहनन करून अपमानित करायचे, छळायचे हे फुले-अांबेडकरी मार्ग आहेत काय? या वर्तनामागे एक तत्त्वज्ञान आहे. खेडेकर त्यांच्या 'आपली माणसं अशी का वागतात?' या पुस्तकात म्हणतात, ''नेता हाताबाहेर जातो, असे वाटल्यास जवळचे जपून ठेवलेले त्याचे विरोधातील 'शिवअस्त्र' काढावे. सरळसरळ त्याला 'ब्लॅकमेल' करून खुंटय़ाला बांधून ठेवावे.'' (पृ. २७) ब्लॅकमेिलगचे शस्त्र हे फुले अांबेडकरी विचारधारेत बसते काय? चळवळी आणि अंडरवर्ल्ड यात काही फरक असणार की नाही? 'हुजरेगिरी' आणि 'चमचेगिरी' हा चळवळीचाच भाग समजावा, असे लिहिण्यापर्यंत ज्यांची मजल जाते त्यांचा अध:पात कोण थांबवणार? (आपली माणसं, पृ. २७) चळवळीतील सहकारी काही चिकित्सा करायला लागला की त्याला ब्राह्मणांचा हस्तक, दलाल, गद्दार अशा ठेवणीतल्या शिव्या देऊन त्याचे तोंड बंद करायचा प्रकार केला जातो. खेडेकर आणि मूलनिवासी नायकचे संपादक यांच्या लेखणीने सगळे ताळतंत्रच सोडले आहे. इतिहासाची मोडतोड करण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. उच्चवर्णीय इतिहासकारांनी गाय मारली म्हणून बहुजनांनी वासरू मारले पाहिजे काय? खेडेकर विरोधी छावणीच्या लेखनामागील तत्त्वज्ञान उलगडवून दाखवताना म्हणतात, ''मानसशास्त्रीय सिद्धांतानुसार एकच बाब सतत सांगत राहिल्यास ती खरी वाटते. (गोबेल्स तंत्र) खोटी गोष्ट भावनेला जोडून सांगितल्यास ती खरी वाटते.'' (बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास, पृ. १०) स्वत: खेडेकर या तंत्राचाच तर वापर करीत असतात.
खेडेकर म्हणतात, ''महाराजांनी रामदासांचे सुमारे सहाशे ब्राह्मण शिवराज्याभिषेकास विरोध करण्यासाठी आले असता उभे कापून काढले. महाराजांनी गोळीबाराचा हुकूम फर्मावला. पटापट शेपाचशे मुडदे पडले. रामदासी संपले. रस्ता मोकळा झाला. राज्याभिषेक समारंभ ब्राह्मण संपल्यावर निर्वघ्निपणे पार पडला.'' ('आपली माणसं' अशी का वागतात? पृ. १७) ते पुढे म्हणतात, ''रामदासाने आदिलशहासमोर शपथ घेतल्याप्रमाणे जिजाऊ, शिवराय, संभाजी व राजाराम यांचे खून केले.'' (महाराज माफ करा, पृ. २५) ''श्रीकृष्ण हा स्त्रीउद्धारक होता.. श्रीकृष्ण हा समतेचे, न्यायाचे प्रतीक आहे. तर विष्णू हा विषमतेचे, अन्यायाचे प्रतीक. श्रीकृष्ण बहुजनांचा तर विष्णू ब्राह्मणांचा! जातिनिर्मूलनासाठी श्रीकृष्णाने सर्व जातबांधवांच्या शिदोऱ्या एकत्रित करून त्याचा काला तयार केला'' (मराठय़ांचे रामदासीकरण, पृ. १९) असे खेडेकरांचे संशोधन आहे. रिडल्स ऑफ राम अ‍ॅण्ड कृष्ण लिहिणाऱ्या आणि रामकृष्णांचे गौडबंगाल उलगडून दाखवणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी खेडेकरांची ही मते काडीमात्र जुळत नाहीत. किंबहुना ती पूर्णपणे विरोधात जातात. तरीही खेडेकर आंबेडकरवादी आहेत असे कसे म्हणायचे? शिवरायांनाही वेठीला धरताना शिवरायांच्या तोंडी ते चक्क काल्पनिक मजकूर घालतात. ते म्हणतात, ''शिवराज्याभिषेकाच्या वेळी गागाभट्टाने महाराजांना प्रायश्चित्त घेण्यासाठी यज्ञ करावा लागेल असे सांगितले. तेव्हा महाराजांना त्यांनी प्रत्येक ब्रह्महत्येमागे आठ हजार होन दक्षिणा मागितली. महाराज म्हणाले, 'ब्रह्महत्या म्हणून प्रत्येकी आठ हजार होन द्यायला मी तयार आहे. पण एक करा, सध्या जिवंत असलेल्या भटांचीही मोजणी करा, त्यांनाही संपवून टाकू. त्याबद्दल प्रत्येकी आठ हजार होन देऊन टाकू. गागाभट्ट चरकला. महाराजांचे हे अर्धवट राहिलेले कार्य पूर्ण करण्याची मोठी जबाबदारी शिवभक्तांवर येऊन पडली आहे. त्यासाठी शिवभक्तांनी तयार राहावे.'' (ब्राह्मण राष्ट्राचा बुरखा हिंदू राष्ट्र, पृ. १९) असे खेडेकरांचे हिंसक प्रतिपादन आहे. यातून हे स्पष्ट होते की, खेडेकर बिनदिक्कतपणे शिवरायांना वेठीला धरून स्वत:च्या हिटलरी विचारांचा प्रचार करीत आहेत.
खेडेकरांच्या मते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे औरंगजेबापेक्षा वाईट आहेत. खेडेकर म्हणतात, ''औरंगजेब बादशहाने बापाला तुरुंगात टाकून मारले. पण बापाच्या वंशाच्या विचारांचे राज्य देशाबाहेरही विस्तारीत केले. बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या बापाला शेवटपर्यंत जिवंत ठेवले, परंतु त्यांच्या विचारांची राजरोस हत्या करून महापाप केले आहे. शारीरिक हत्या ही राज्यकारभारात क्षम्य असते. परंतु सामान्य जनतेच्या उत्थानासाठी असलेली विचारधारा नष्ट करणे यास क्षमा नाही. या मापदंडानुसार बाळासाहेब ठाकरे हे औरंगजेबापेक्षा जास्त अपराधी ठरतात. कारण त्यांनी प्रबोधनकार ठाकरेंची शिवसेना रामदासांच्या दावणीला बांधली. आपल्याच बापाशी प्रतारणा करणारे बाळासाहेब ठाकरे शिवसेनाप्रमुख आहेत.'' (बहुजनहिताय, पृ. २७) बाळासाहेब ठाकरेंना सुनावताना खेडेकर म्हणतात, ''ठाकरे, आमच्या मातेऱ्यावर तुमचे पूर्वज पोसलेत व तुम्ही करोडपती झालात.'' (पृ. ३३) ठाकरेंची शिखांच्या विरोधात बोलण्याची िहमत नाही असे खेडेकरांना वाटते. ''शिखांच्या विरोधात बोलल्यास इंदिरा गांधींसारखे मरावे लागेल. बाळासाहेब ठाकरी भाषेत यावर एकदा बोलाच'' (पृ. ४१) अशा शब्दांत ते बाळासाहेब ठाकरे यांना चॅलेंज करतात. खेडेकरांचे अजब तर्कशास्त्रच कुठूनही कुठे जात असते. ते म्हणतात, ''आज लोकशाही नसती तर नारायण राणे, राज ठाकरे अशा अनेक मर्दानी बाळ ठाकरे, मनोहर जोशी यांच्या हत्या याच तत्त्वानुसार केल्या असत्या. इत:पर आजही ठाकरे कुटुंबातीलच मीनाताई ठाकरे वा िबदुमाधव ठाकरे या मायलेकांच्या मृत्यूचे गूढ उकलले नाही.'' (बहुजन हिताय, पृ. २१) शिवसनिकांनी हे सारे वाचलेले नसणार. त्यांनी हे साहित्य काळजीपूर्वक वाचून त्यावर खेडेकरांशी चर्चा केली पाहिजे.
खेडेकर राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्यावरही टीका करतात. ते म्हणतात, ''आज संपूर्ण देशात एकाही राजकीय पक्षावर मराठी नेतृत्वाचा अंकुश नाही. एकाही पक्षाचा प्रमुख कुणबी-मराठा नाही. राष्ट्रवादीचे अध्यक्ष कुणबी शरद पवार आहेत. पण सत्यशोधकी आई शारदाबाईंचे संस्कार त्यांनी शंकराचार्याच्या चरणी वाहिलेत.'' (कुणबी मराठा समाजाच्या यशाची पंचसूत्री, पृ. २५) मराठा स्त्रियांबद्दल खेडेकरांच्या मनात नेमक्या काय भावना असाव्यात? ते म्हणतात, ''पुरुषार्थ हाच जगातील सर्व समाजांमध्ये पुरुषाचा अलंकार समजला जातो. शुद्ध व बीजधारी वीर्य हेच पुरुषांसाठी सर्वकाही असते.. पुरुषाचा पुरुषार्थ हा त्याच्या सहकारी स्त्रीचे पूर्ण लंगिक समाधान करण्यात असतो.. आपली मादी आपल्याच ताब्यात राहावी व आपणच भोगावी यासाठी जनावरे मरणही पत्करतात; परंतु जिवंतपणी आपली मादी इतर कुणी भोगत असल्याचे पाहू शकत नाही.. गावातील एखाद्या सुंदर कुत्रीच्या पाठीमागे अनेक कुत्रे असतात, पण ती इतरांना हुंगतही नाही. एखादा बलदंड कुत्रा तिची कामेच्छा पूर्ण करण्यात पुढाकार घेतो.. आपली सुंदर, तरुण, भरगच्च भरलेली बायको कोणाशी साधी लगट करताना दिसली तरी मराठा बहुजन आकांडतांडव करतो. आपल्या देखण्या बायकोवर सोबतचे लोक लाइन मारतील एवढय़ा साध्या कल्पनेनेही मराठा पुरुष आपल्या रूपवान तरुण बायकोला सार्वजनिक कार्यक्रमांना नेत नाहीत.'' (शिवरायांच्या बदनामीची केंद्रे, पृ. ३४, ३५) मराठा स्त्रियांच्या विशेषत: जिजाऊ ब्रिगेडच्या माताभगिनींच्या प्रतिक्रिया या लेखनाबाबत कळल्या तर बरे होईल. हे लेखन मराठा समाजातील स्त्री-पुरुष या दोघांचीही बदनामी करणारे नाही काय? तसेच या पुस्तकात इतरत्र मराठा पुरुषांचे चित्रण पुरुष वेश्या म्हणून सरसकट करण्यात आले आहे, हा लढवय्या मराठा पुरुषांचा अपमान नाही काय? आपण काहीही लिहिले किंवा बोललो तरी मराठा समाज निमूटपणे त्यावर विश्वास ठेवील अशी खेडेकरांना खात्री आहे. त्यांची मदार तरुण पिढीची ऊर्जा, हिटलरी आदर्शवाद, ओबीसी विरोध, दुषित पूर्वग्रह आणि माथेफिरूपणा यावर आहे. फुले-आंबेडकरी विचारधारेला त्यांनी जिल्हा परिषदेच्या राजकारणाची कळा आणली आहे. हे चालवून घ्यायचे काय?

खेडेकरांच्या मते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे औरंगजेबापेक्षा वाईट आहेत. खेडेकर म्हणतात, ''औरंगजेब बादशहाने बापाला तुरुंगात टाकून मारले. पण बापाच्या वंशाच्या विचारांचे राज्य देशाबाहेरही विस्तारीत केले. बाळासाहेब ठाकरेंनी आपल्या बापाला शेवटपर्यंत जिवंत ठेवले, परंतु त्यांच्या विचारांची राजरोस हत्या करून महापाप केले आहे.

खेडेकर बहुजन समाजाने यशस्वी क्रांतीच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी आदर्श नेते आणि विचारवंत यांच्या मार्गाने जाण्याचा सल्ला देतात. (बहुजनांच्या सत्तांतराचा संघर्ष, पृ. ३१) त्यांनी दिलेल्या महापुरुषांच्या व विचारवंतांच्या ६८ जणांच्या यादीतील २६ जण दिवंगत झालेले आहेत. ४२ विद्यमान प्रबोधनकारांमध्ये खेडेकरांनी कोणाकोणाचा समावेश केलेला आहे हे बघणे उद्बोधक ठरेल. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी कर्त्यां लोकांची यादी केली होती. त्यात म. फुले, सावित्रीबाई, शाहू महाराज, ताराबाई शिंदे आदींचा समावेश नव्हता. खेडेकरांच्या या यादीतील हयात ४२ जणांपकी ३४ जण हे सत्ताधारी मराठा किंवा कुणबी जातीतील आहेत. २ बौद्ध आहेत. २ मुस्लीम आहेत. उर्वरित सर्व दलित, आदिवासी, भटकेविमुक्त, ओबीसीतून खेडेकरांनी अवघे ४ जण घेतलेले आहेत. या यादीत धनगर, माळी, वंजारी, आग्री, भंडारी, कुंभार, चर्मकार, साळी, न्हावी, िशपी आदी समाजातून एकालाही स्थान मिळालेले नाही. ज्यांचे अनुकरण करणे म्हणजे फुले-अांबेडकरी विचाराचा प्रचार, प्रसार करणे अशी खेडेकरांची धारणा आहे त्या यादीची ही अवस्था आहे. या यादीत न्या. पी. बी. सावंत, शरद पाटील, रावसाहेब कसबे, भालचंद्र मुणगेकर, डॉ. जनार्दन वाघमारे, गोिवद पानसरे, एन. डी. पाटील, सदानंद मोरे, डॉ. बाबा आढाव, उत्तम कांबळे, रझिया पटेल, सय्यदभाई, लक्ष्मण माने, एकनाथ आव्हाड, बाळकृष्ण रेणके, महादेव जानकर, श्रावण देवरे, प्रदीप ढोबळे, हनुमंत उपरे, बाबुराव गुरव, लक्ष्मण गायकवाड, राजा ढाले, गेल ओम्वेट, सुनील सरदार, शाम मानव, सुखदेव थोरात अशा बहुजनातील कोणालाही स्थान नाही. फुले-आंबेडकरी चळवळीला आपला मतदारसंघ समजून तेथील आधीपासूनच्या नेत्यांना हाकलू पाहणारे खेडेकर कोणाला फुले-अांबेडकरवादी मानतात ते स्पष्ट होते. खेडेकर मुळात जाती निर्मूलनवाले नसून जात्योन्नतीवादी आहेत, हा प्रा. श्रावण देवरे यांचा दावा योग्यच आहे. खेडेकरांना फुले-अांबेडकरी चळवळीत घुसखोरी करून ती चळवळ हायजॅक करायची आहे. त्यासाठी मूळच्या चळवळवाल्यांस बदनाम करणे किंवा त्यांना हद्दपार करणे यावर त्यांचा भर आहे. त्यांचा आराखडाच त्यांनी आपल्या एका पुस्तकात दिला आहे. ''आपले काम सिद्धीस नेण्यासाठी प्रसंगी शत्रूबरोबरही मत्रीचे नाटक करावे लागते. ते तुम्ही करा.. तुमची ताकद कावेबाजपणे वाढवा.. योग्य वेळ येताच आपल्या कपटनीतीचा अवलंब करून (राक्षस) समाजावर हल्ला करावा.'' (बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास, पृ. ५८) खेडेकर हा उपदेश विष्णूचा म्हणून सांगत असले तरी मुळात तो स्वत:च्या अनुयायांना व सत्ताधाऱ्यांना खेडेकरांनी केलेला उपदेश आहे. फुले-अांबेडकरी चळवळ कशी ताब्यात घ्यायची याचा तो मूलमंत्रच आहे. खेडेकरांचे फुले-अांबेडकरी प्रेम अस्सल आहे की तो त्यांचा मुखवटा आहे याचा शोध त्यांच्याच लेखन आणि कृतींच्या आधारे घेता येतो. ब्राह्मण समाजाबाबतचे त्यांचे आक्षेप हे 'शिवाजी महाराज व ब्राह्मण' याऐवजी 'फुले-अांबेडकर व दलित-ओबीसी' असे लावून बघा. खेडेकर म्हणतात, ''आज आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारे सर्वात जास्त ब्राह्मणच दिसतात. प्रत्यक्षात ब्राह्मणांना शिवाजीबद्दल प्रेम नाही. तर त्यांना बहुजन समाजाच्या मनावर शिवरायांच्या नावाची असलेली पकड वापरावयाची आहे. ब्राह्मणांना शिवचरित्राचे विकृतीकरण करावयाचे आहे.'' (बहुजनांचा सांस्कृतिक इतिहास, पृ. ९७) खेडेकरांनी फुले-अांबेडकरांच्या साहित्याचे जे विकृतीकरण चालविले आहे त्यातून त्यांचा छुपा अजेंडा उघडा पडतो.
महात्मा फुले यांचे साहित्य उद्धृत करताना खेडेकर लिहितात, ''जोतिबांनी सर्वप्रथम परशुराम या ब्राह्मणाच्या बापास सरळ नोटीस पाठवून आमच्या पूर्वजांवर केलेल्या अन्याय-अत्याचाराचे व हत्या या बाबत तुझ्या विरोधात (म्हणजेच आजच्या तुझ्या वंशजांच्या विरोधात) आम्ही हत्यासत्र ही कारवाई का करू नये, अशा प्रकारची कारणे दाखवा नोटीस बजावली'' (महाराज, माफ करा, पृ. ३४) प्रत्यक्षात 'हत्यासत्र' हा शब्द महात्मा फुल्यांच्या नोटिशीमध्ये नाही. तो खेडेकरांनी पदरचा घातला आहे. स्वत:च्या अविचारी मतांचा प्रचार करण्यासाठी ते फुल्यांना वेठीला धरीत आहेत. फुल्यांना हत्यासत्रांचे पुरस्कर्ते आणि माथेफिरू ठरवण्याचा हा निंदनीय प्रकार आहे. जोतिरावांनी दि. १ ऑगस्ट १८७२ रोजी परशुरामाला जाहीर नोटीस दिली होती. ''तू चिरंजीव असशील तर सहा महिन्यांत येऊन हजर हो,'' असा मजकूर या नोटिशीत होता. (पाहा- महात्मा फुले समग्र वाङ्मय २००६, पृ. १७१). त्यात हत्या किंवा हत्यासत्र असा उल्लेखच नाही. स्वत:च्या दंगली, कत्तली आणि हत्यासत्रांच्या हिटलरी विचारसरणीच्या प्रचारासाठी खेडेकर महात्मा फुल्यांच्या साहित्यामध्ये बदल करण्याचा हा जो उद्योग करीत अहेत, त्यामुळे त्यांची विश्वासार्हताच संपुष्टात येते.

''आपली सुंदर, तरुण, भरगच्च भरलेली बायको कोणाशी साधी लगट करताना दिसली तरी मराठा बहुजन आकांडतांडव करतो. आपल्या देखण्या बायकोवर सोबतचे लोक लाइन मारतील एवढय़ा साध्या कल्पनेनेही मराठा पुरुष आपल्या रूपवान तरुण बायकोला सार्वजनिक कार्यक्रमांना नेत नाहीत.''

फुल्यांनी ब्राह्मण मुलींसह सर्व स्त्रियांसाठी शाळा काढल्या. ब्राह्मण विधवांसाठी 'बालहत्या प्रतिबंधकगृह' काढले. एक ब्राह्मण मुलगा दत्तक घेतला. त्याच्या नावे मृत्युपत्राद्वारे आपली सगळी स्थावर-जंगम मालमत्ता केली. 'ख्रिस्त महंमद मांग ब्राह्मणांशी धरावे पोटाशी बंधुपरी' (महात्मा फुले समग्र वाङ्मय, पृ. ५६९) म्हणणाऱ्या फुलेंना ब्राह्मणद्वेष्टय़ा म्हणून रंगविण्यासाठी खेडेकरांनी 'भटोबाचा कर्दनकाळ जोतिबा' ही पुस्तिका लिहिली. नांगराचा फाळ ब्राह्मणाच्या पोटात खुपसून जोतिराव ब्राह्मणाची हत्या करीत आहेत असे चित्र मुखपृष्ठावर दाखविले. फुल्यांनी ब्राह्मणवादावर टीका केलेली आहे. त्यांची टीका तळमळीतून आलेली होती, द्वेषातून नाही. त्यामागे व्यक्तिद्वेष नव्हता. त्यांचा विरोध प्रवृत्तीला होता. खेडेकरांना वैयक्तिक आणि पक्षीय स्वार्थासाठी कत्तली, दंगली, िहसाचार घडवायचा आहे, त्यासाठी फुले वापरावयाचे आहेत. या कामात जे कोणी आडवे येतील त्यांना खेडेकर झोडपतात. छगन भुजबळ, महादेव जानकर आणि रावसाहेब कसबे यांना फुलेविरोधी ठरवायचे आहे. फुल्यांचे बालपणापासूनचे मित्र भांडारकर यांचे फुल्यांनी 'शिवाजी महाराजांच्या पोवाडय़ात' जाहीरपणे आभार मानले. ''हा पोवाडा एकंदर तयार करतेवेळी माझे लहानपणीचे मित्र भांडारकर यांनी इतर दुसऱ्या लोकांसारख्या पायात पाय न घालता मला या कामात नेहमी िहमत देऊन वारंवार माझ्या कल्पना नीट जुळाव्यात म्हणून बरीच मदत दिली. यास्तव मी त्यांचा ऋणी आहे.'' (म.फु.स.वा, पृ. ४४) असे कृतज्ञतेने १८६९ साली नमूद करणाऱ्या फुल्यांनी आपल्या या जिवाभावाच्या नि आयुष्यभराच्या मित्राची स्वत:च्या मृत्युपत्रावर १८८७ साली साक्ष घेतलेली आहे. (म.फु.स.वा., पृ. ६४८) साक्षीदार म्हणून जवळच्याच व्यक्तीची निवड केली जाते ना? याच मृत्युपत्राचा खेडेकर ब्राह्मणद्वेषासाठी सतत वापर करीत असतात. सदर मृत्युपत्राची अस्सल प्रत मी स्वत: सह जिल्हानिबंधक पुणे, (मध्यवर्ती अभिलेख) कार्यालयातून शोधून काढून फुले समग्र वाङ्मयात छापलेली आहे. मृत्यूनंतर करावयाचे विधी फुलेंना भटजीऐवजी सत्यशोधक पद्धतीने करायला हवे होते. त्याची नोंद करताना तेथे भटजी नको असे फुले लिहितात. त्यातही 'शूद्रातिशूद्रांना दासानुदास मानणाऱ्या' भटजींना फुले प्रवेश वर्जति करतात. तथापि, खेडेकर मात्र या मजकुराचा गरवापर करून फुल्यांचे विद्वेषवादी चित्रण करीत असतात. खेडेकर म्हणतात, ''छगन भुजबळ यांनी जोतिरावांचे मृत्युपत्र मुळातच वाचावे. त्यांनाच ब्राह्मणांचा जास्त पुळका आहे.. आम्ही ब्राह्मणद्वेष वाढवतो असे भुजबळांचे गरसमज आहेत. ते दूर होण्यासाठी त्यांनी जोतिबांचे पूर्ण साहित्य वाचावे. नंतर समता सांगावी.'' (आपली माणसं, पृ. २०) खेडेकरांच्या क्लृप्त्या उघडय़ा करणाऱ्यांना ते 'भटाळलेला' अशी पेटंट शिवी देत असतात. ते म्हणतात, ''बहुजन समाजातील भटाळलेला, शिकलेला माणूस हा कट्टर ब्राह्मणापेक्षा धोकादायक असतो.'' (बहुजनांच्या सत्तांतराचा संघर्ष, पृ. ४) एवढेच नाही तर असे लोक हे आपले शत्रू आहेत. अशी शिकवण ते अनुयायांना देतात. ''आपली लढाई कट्टर, जात्यंध, कर्मठ ब्राह्मणशाहीविरुद्ध आहे. तशीच आपल्या बहुजन समाजातील ब्राह्मणशाहीचे हस्तक व गुलाम झालेल्या बहुजनांविरुद्धही आहे.'' (पृ. २४) खेडेकरांचे आदर्श मुळातच हिटलर व औरंगजेब हे असल्याने त्यांना चर्चा, चिकित्सा किंवा मतभेद मान्यच नसतात. वेगळ्या सुरात बोलणारा प्रत्येक माणूस आपला शत्रूच आहे अशी त्यांची धारणा असते. त्यामुळे सोबत काम केलेल्या कुणालाही ते रातोरात शत्रू घोषित करून मोकळे होतात. खेडेकर आत्मकेंद्रित आणि 'नार्सििसस्ट' आहेत. त्यांचे फक्त स्वत:वरच प्रेम आहे. जबर महात्त्वाकांक्षा आणि उतारवयामुळे येत असलेले नराश्य यातून ते अधिकाधिक अतिरेकी बनत चालले आहेत. ते म्हणतात, ''सध्या संभाजी ब्रिगेडची वाटचाल याच दिशेने चालू आहे. (असे कधीच न सुटणारे प्रश्न मरेपर्यंत वा आम्ही थकेपर्यंत चालवत असतो. आमची क्षीण होत जाणारी ताकद व शरीरयष्टी नेते पाहत असतात.) संभाजी ब्रिगेडचे अनेक नेते व कार्यकर्ते गळाला स्वत:च्या माना टांगून लटकावून आहेत. त्यांच्या तोंडात मासा पडण्याची शक्यता कमी आहे. हे सगळे मला दिसते. पण माझी अवस्था तरुण व सुंदर बायको असणाऱ्या हाडकुळ्या बामणासारखी झाली आहे.'' (आपली माणसं अशी का वागतात, पृ. २७) खेडेकरांचा हा कबुलीजबाब स्वयंस्पष्ट आहे. त्यावर कोणतीही टिप्पणी करायची गरजच नाही. सत्ताधारी नेत्यांनी आपला वापर केल्याची आणि फसवणूक केल्याची खंत त्यांच्या लेखनातून अनेकदा व्यक्त होते. ''आमच्या पुढाऱ्यांनी व आमच्या नेत्यांनी आमच्या चळवळीची अंतर्बाह्य़ सर्वच मापे जुळवलेली आहेत.. चळवळीचे नेते विकत घेतले जाऊ शकतात, हे ते सिद्ध करत असतात.. नेते जातीने आपले असतात, मतीने असतातच असे नाही. आणि आतातर आपली औकातच त्यांना माहीत आहे. आपणच त्यांना पुढे होऊन वाकून 'जय जिजाऊ' करतो, अस्मिताच मेली!'' (आपली माणसं, पृ. २५, २६) ही खेडेकरांची व्यथा आहे की आत्मकथा? अपयश, अपराधगंड आणि मानसिक असंतुलन यांचा पगडा खेडेकरांच्या अलीकडच्या सर्वच लेखनावर जाणवतो.
(क्रमश:)
harinarke@yahoo.co.in

http://www.loksatta.com/lokprabha/20110805/talebanda.htm

Dhanyawad.

Ramesh Shinde

Visit  www.hindujagruti.org



--
visit @
http://divyamarathi.bhaskar.com/
www.psiddharam.blogspot.com

Friday, August 5, 2011

.अंधश्रद्धा निर्मूलनाऐवजी धार्मिक श्रद्धा समूळ नष्ट करण्याचा खटाटोप


http://www.loksatta.com/lokprabha/20110812/cover.htm

कव्हर स्टोरी

संदीप आचार्य
विधानसभेत सरकार मांडू इच्छित असलेल्या 'महाराष्ट्र नरबळी व अन्य अमानवीय व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम
२०११' या विधेयकाविरुद्ध वारकरी पंथासह अनेक धार्मिक व आध्यात्मिक
संघटनांनी पवित्रा घेतला आहे. विधेयकातील संभाव्य कलमे म्हणजे अंधश्रद्धा
निर्मूलनाऐवजी धार्मिक श्रद्धा समूळ नष्ट करण्याचा खटाटोप
ठरेल, अशी भीती
धार्मिक संस्था, वारकरी संप्रदाय तसेच राजकीय पक्षांकडून व्यक्त करण्यात
येत आहे. असं या लोकांना का वाटतंय? एक शोध.




हिंदू धर्माच्या विविध पोथ्या-पुराणांमध्ये चित्तचक्षू चमत्काराच्या
असंख्य कथा आणि आख्यायिका आहेत. शतकानुशतके देवळांमधून,
कीर्तन-प्रवचनांतून या कथा सांगितल्या जातात व श्रद्धेने ऐकल्या जातात.
कोणी या कथांना चमत्कार मानत असतील तर कोणी भाकडकथा मानत असतील. कोणाचा
यावर विश्वास असेल तर कोणाचा धर्मावर व धार्मिक विधींवरच विश्वास नसेल.
मात्र या साऱ्यातून कधी समाजात तेढ निर्माण झाली नाही.
संत ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मुक्ताबाईने मांडे भाजल्याची कथा ऐकून
कोणत्याही बहिणीने आपल्या भावाच्या पाठीवर मांडे भाजण्याचा उद्योग
केल्याचे ऐकिवातही नाही. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील सीमारेषा अत्यंत
पुसट आहे. त्यामुळे देशावर राज्य करणाऱ्या कोणत्या राजा-महाराजांनीही कधी
धार्मिक व्यवस्थेत साधुसंतांच्या संमतीशिवाय हस्तक्षेप केला नाही.
मात्र महाराष्ट्रातील काँग्रेस-राष्ट्रवादीचे आघाडी सरकार अंधश्रद्धा
निर्मूलनाच्या नावाखाली जे नवीन विधेयक मांडू पाहत आहे, त्यामुळे आमच्या
धार्मिक स्वातंत्र्यावरच गदा येणार असल्याचे वारकरी संप्रदाय, मुस्लीम,
ख्रिश्चन तसेच जैन समाजातील विविध धर्मगुरूंचे म्हणणे आहे. हा अंधश्रद्धा
निर्मूलनासाठी केला जाणारा कायदा नाही तर 'अंध'पणे आमच्या श्रद्धांवर
घाला घालण्याचे कारस्थान
असल्याचा आरोप विविध वारकरी संप्रदायांच्या
लोकांकडून करण्यात येत आहे.
सरकारला 'भूत' व 'भूतबाधा' हे शब्द मान्य आहेत अथवा नाही, ते प्रथम
सरकारने स्पष्ट करणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे ज्योतिष विषयाबाबतही
सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. श्रद्धा व अंधश्रद्धा यातील
फरक, अघोरी विद्या, जादूटोणा, मंत्र-तंत्र आदींमधील फरक सांगणाऱ्या
व्याख्या कराव्यात, त्यानंतरच अंधश्रद्धा निर्मूलनाबाबतचा कायदा
करण्यासाठी पावले उचलावीत, अशी स्पष्ट भूमिका वारकरी संप्रदायातील
मान्यवरांनी घेतली आहे.
सरकारमधील अनेक मंत्री, विविध पक्षांचे राजकारणी ज्योतिषांचे उंबरठे का
झिजवतात, हातात ताईत, गंडे का बांधतात, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा का
घालतात, दरवाजावर काळी बाहुली का लावतात, आता तर फेंगशुईचे वेड अनेक
नेत्यांना का लागलेले दिसते,
असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातायत.
पंढरपूरच्या विठ्ठलाची एकादशीला पूजा करून महाराष्ट्रात पाऊस पडू दे, अशी
प्रार्थना करणारे मुख्यमंत्री हे श्रद्धा जोपासतात की अंधश्रद्धा?
सरकार
या अधिवेशनात आणू पाहत असलेल्या विधेयकाचा विचार करता मुख्यमंत्री पाऊस
पडू दे, अशी प्रार्थना करीत असल्यामुळे अंधश्रद्धा जोपासतात म्हणून
त्यांच्यावर खटला भरला तर.. असा सवालही वारकरी संप्रदायातील
मान्यवरांकडून करण्यात येत आहे.
सत्य साईबाबांच्या हवेतून अंगठी काढणे, अंगारा काढणे याला भोंदूगिरी
मानणारे जसे अनेक आहेत, तसेच माजी राष्ट्रपतींपासून क्रिकेटचा देव
असलेल्या सचिन तेंडुलकरसह लाखो मान्यवरांची त्यांच्यावर अपरंपार
श्रद्धाही ठेवून आहेत. सत्य साईबाबांच्या चमत्काराचा प्रसार केल्यास
सरकार आणू पाहत असलेल्या कायद्यानुसार गुन्हा ठरू शकतो का, असाही प्रश्न
उपस्थित केला जात आहे.

सत्य साईबाबांच्या हवेतून अंगठी काढणे, अंगारा काढणे याला भोंदूगिरी
मानणारे जसे अनेक आहेत, तसेच माजी राष्ट्रपतींपासून क्रिकेटचा देव
असलेल्या सचिन तेंडुलकरसह लाखो मान्यवरांची त्यांच्यावर अपरंपार
श्रद्धाही ठेवून आहेत.

यापूर्वीही सरकारने अंधश्रद्धा निर्मूलन करण्यासाठी कायदा आणण्याचा
प्रयत्न केला होता. 'महाराष्ट्र जादूटोणा, अनिष्ट आणि अघोरी प्रथा यांचे
समूळ उच्चाटन अधिनियम २००५' हे विधेयक महाराष्ट्राच्या विधिमंडळात विविध
पक्षांच्या तीव्र आक्षेपांमुळे मंजूर होऊ शकले नव्हते. आता हेच विधेयक
काही तरतुदी व शब्दरचना बदलून 'महाराष्ट्र नरबळी व अमानवीय अनिष्ट व
अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम
२०११' या नावाने आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. या विधेयकातील संभाव्य
कलमे म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलनाऐवजी धार्मिक श्रद्धा समूळ नष्ट
करण्याचा खटाटोप ठरेल, अशी भीती धार्मिक संस्था, वारकरी संप्रदाय तसेच
राजकीय पक्षांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या विधेयकासंदर्भात १९ जुलै रोजी
वारकरी संप्रदायासह विविध धार्मिक संस्थांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली
होती. यावेळी या विधेयकातील कलम तेरासह विविध मुद्दय़ांवर उपस्थितांनी
आक्षेप नोंदवले. तसेच या कलमांमधील चमत्कार, अघोरी, अनिष्ट प्रथा यांसह
विविध शब्दांच्या विस्ताराने व्याख्या होणे आवश्यक असल्याचे सांगितले
होते. मात्र या आक्षेपांना उपमुख्यमंत्र्यांनी फारसा प्रतिसाद दिला नाही,
तसेच हे विधेयक बहुमताच्या जोरावर आम्ही मंजूर करून घेऊ, असे त्यांनी
सांगितल्याचे हिंदू जनजागृती समितीचे प्रवक्ते रमेश शिंदे यांनी
सांगितले.
या विधेयकाबाबत बोलताना शिवसेना नेते व आमदार दिवाकर रावते म्हणाले की,
२००५ मध्ये हे विधेयक सरकारने विधिमंडळात आणले होते, त्यावेळी त्याला
प्रचंड विरोध झाला होता. हिंदूंच्या धार्मिक भावनांशी खेळण्याचा सरकारला
काहीही अधिकार नाही. हे विधेयक ज्यावेळी विधिमंडळाच्या चिकित्सा समितीकडे
गेले होते, त्यावेळी सुमारे सव्वालाख नागरिकांनी आपले आक्षेप या
विधेयकांच्या विरोधात नोंदवले होते. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात विरोध होणारे
कदाचित हे पहिलेच विधेयक असावे.

लोकांचा विरोध लक्षात घेऊन या आक्षेपांतील समान मुद्दय़ांची छाननी
करण्याचे निश्चित करण्यात आले. त्यानुसार छाननी केली असता जवळपास ७६ हजार
लोकांचे मुद्दे समान असल्याचे आढळून आले. विक्रम म्हणून पाहावयाचे
झाल्यास याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होऊ शकेल, असेही
रावते म्हणाले.

हे विधेयक ज्यावेळी विधिमंडळाच्या चिकित्सा समितीकडे गेले होते, त्यावेळी
सुमारे सव्वालाख नागरिकांनी आपले आक्षेप या विधेयकांच्या विरोधात नोंदवले
होते. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात विरोध होणारे कदाचित हे पहिलेच विधेयक असावे.

भारताच्या संविधानात सर्वधर्मसमभाव असे म्हटलेले आहे. त्यामुळे हा कायदा
सर्व धर्माना लागू होणार का, असा सवाल त्यावेळी विधान परिषदेत आपण केला
होता, असे सांगून रावते म्हणाले, 'तत्कालीन सामाजिक न्यायमंत्री
चंद्रकांत हंडोरे यांनी हा कायदा मुस्लीम समाजाला लागू होणार नाही,'
असे
उत्तर त्यावेळी दिले होते. हिंदूंच्या सर्वच ग्रंथांमध्ये देव-देवतांनी
केलेले पराक्रम हे चमत्काराच्या व्याख्येत येऊ शकतील. यातून मोठा असंतोष
निर्माण होऊ शकतो, असे सांगून पंढरपूरच्या विठ्ठलाकडे पाऊस पडण्यासाठी
मुख्यमंत्री वेळोवेळी साकडे घालतात. तेही अंधश्रद्धा ठरवून त्यांच्यावर
खटला भरणार का, असा सवाल त्यांनी केला.
राज्यापुढील सर्व प्रश्न आता संपले आहेत. अतिरेकी यापुढे कधीही मुंबईवर
हल्ला करणार नाहीत, बॉम्बस्फोट होणार नाहीत, असा चोख बंदोबस्त सरकारने
ठेवला आहे. राज्याची तिजोरी भरून वाहत आहे. आता सरकारपुढे कोणतेही काम
शिल्लक राहिलेले नसून अंधश्रद्धा निर्मूलनाचेच काय ते एकमेव काम शिल्लक
राहिले आहे, अशी सरकारची समजूत आहे का,
असा सवाल विधानसभेतील विरोधी
पक्षनेते एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला. सरकारने राज्यावरील कर्जाचा
बोजा दोन लाख ३१ हजार कोटींवर नेऊन ठेवला आहे. राज्यात भ्रष्टाचाराचे रोज
नवे 'आदर्श' उभे राहत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्येला खंड पडलेला नाही.
अतिरेक्यांच्या वेळोवेळी होणाऱ्या हल्ल्याने जनता त्रस्त असताना
लोकांच्या धार्मिक भावनांशी खेळण्याचे उद्योग सरकार का करत आहे, असा सवाल
करत ही 'दादागिरी'चालू देणार नाही, असेही खडसे यांनी ठणकावून सांगितले.
या विधेयकातील कलम तेरा सर्वधर्मीयांच्या श्रद्धांचे 'तेरावे' घालण्याचा
प्रकार असल्याचे सांगून हे कलम रद्द झाले पाहिजे, अशी मागणी त्यांनी
केली.
'मुळात अनिष्ट प्रथा व चालीरीती तसेच नरबळीसारख्या घटनांना रोखण्यासाठी
भारतीय दंड संविधानात पुरेशी तरतूद आहे. त्याचा वापर का कठोरपणे केला जात
नाही
, असा प्रश्न करीत आहे. त्या कायद्याचा प्रभावीपणे वापर करायचा नाही
आणि विनाकारण समाजाचे स्वास्थ्य बिघडविणारे विधेयक आणायचे हे कसले
सरकारचे धोरण आहे,' असा प्रश्न भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे विधेयक मंजूर व्हावे यासाठी का पुढाकार व
बैठका घेत आहेत, असा सवाल करीत राष्ट्रवादीच्या खासदार व राष्ट्रवादी
काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या
मतदारसंघात मोठय़ा संख्येने वारकरी संप्रदायाचे मतदार आहेत, ते या
विधेयकामुळे नाराज झाल्यास सुंठीवाचून खोकला जावा, अशी तर योजना नाही ना,

अशी शंका देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
'महाराष्ट्र नरबळी व अमानवीय अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना
प्रतिबंध व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम २०११' या नावाने आणण्यात येत
असलेल्या विधेयकाच्या प्रस्तावनेतच 'अज्ञानावर पोसल्या जाणाऱ्या अनिष्ट व
दुष्ट प्रथांपासून समाजातील लोकांचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने तसेच
समाजातील लोकांचे मानसिक, शारीरिक व आर्थिक शोषण करून नुकसान करण्याच्या
व त्याद्वारे समाजाची घडी विस्कटून टाकण्याच्या दुष्ट हेतूने
भोंदूबाबांनी सर्वसामान्यत: जादूटोणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तथाकथित
अतिंद्रिय किंवा अमानुष शक्ती किंवा चमत्कार करून भूतपिशाच्च यांच्या
नावाने समाजात रुजविलेल्या अनिष्ट व दुष्ट प्रथांचा व अघोरी रूढींचा
मुकाबला करून समूळ उच्चाटन करण्यासाठी व समाजात चांगले वातावरण निर्माण
करण्यासाठी हे विधेयक' आणण्यात येत असल्याचे म्हटले आहे. यातील कलम १३
मध्ये म्हटले आहे की, ''ज्यामुळे व्यक्तीला शारीरिक वा आर्थिक बाधा
पोहोचत नाही, असे कोणताही धार्मिक विधी व धार्मिक कृत्य अंतर्भूत
असलेल्या कृतींना या अधिनियमातील कोणतीही गोष्ट लागू राहणार नाही,''
नेमक्या याच कलमाला सर्वाचा आक्षेप आहे. त्याचप्रमाणे यातील आणखी एका
कलमामुळे बाधित व्यक्तीशिवाय त्रयस्थ व्यक्तीलाही गुन्हा दाखल करण्याचा
अधिकार मिळणार आहे. तसेच या विधेयकातील व्याख्येनुसार कोणताही अपराध
एखाद्या कंपनीने (धार्मिक संस्था, समिती, विश्वस्त) केला असल्यास
त्यांच्यावरही गुन्हा दाखल होऊ शकेल.

सरकारमधील अनेक मंत्री, विविध पक्षांचे राजकारणी ज्योतिषांचे उंबरठे का
झिजवतात, हातात ताईत, गंडे का बांधतात, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा का
घालतात, दरवाजावर काळी बाहुली का लावतात, आता तर फेंगशुईचे वेड अनेक
नेत्यांना का लागलेले दिसते, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातायत.

या विधेयकाबाबत माजी न्यायाधीश सुधाकर चपळगावकर म्हणाले की,
''विधेयकासंदर्भात अनिष्ट, चमत्कार, अघोरी, श्रद्धा, अंधश्रद्धा अशा
विविध शब्दांच्या व्याख्या व्यापक पणे स्पष्ट होणे आवश्यक आहे. अन्यथा हे
विधेयक मंजूर झाल्यास मोठा गोंधळ निर्माण होईल. वारकरी, कीर्तनकार व
प्रवचनकारांच्या कोणत्याही धार्मिक प्रवचनात देवादिकांच्या तसेच संतांनी
केलेल्या चमत्काराची असंख्य उदाहरणे मांडली जातात. तो चमत्कार ठरून
त्यांच्यावर उद्या गुन्हाही दाखल होऊ शकतो. सरकारला भूत मान्य नाही,
सर्वसामान्य माणसाने भुताखेतांच्या निराकरणासाठी काही केल्यास या
कायद्यानुसार त्याच्यावर कारवाई होऊ शकते,'' असे सांगून ''मारुती स्तोत्र
व रामरक्षा स्तोत्रामध्ये भूतप्रेत संमंधादी नष्ट करण्याचा उल्लेख आहे,
त्यामुळे त्याच्या विक्री व प्रसारावर सरकार बंदी घालणार का,'' असा
सवालही न्यायमूर्ती चपळगावकर यांनी केला.
''केवळ हिंदू धर्मातीलच नव्हे तर मुस्लीम व ख्रिश्चन धर्मातील अनेक विधी
या कायद्याच्या कक्षेत येऊन शिक्षेला पात्र ठरू शकतील, असे हिंदू
जनजागृती समितीचे प्रवक्ते रमेश शिंदे यांनी सांगितले. ''अनेक धार्मिक
ग्रंथांमध्ये भूत काढणे, मंत्र-तंत्र, अघोरी विद्या, शाकिनी, डाकिनी,
कुष्मंडा, ब्रह्मराक्षस, हडळ आदींचा उल्लेख आहे. प्रामुख्याने
नवनाथांच्या पोथ्या व ग्रंथांमध्ये याचा उल्लेख असून हे विधेयक मंजूर
झाल्यास ही सर्व ग्रंथसंपत्ती बेकायदा ठरून ती जप्त करता येऊ शकेल,'' अशी
भीती रमेश शिंदे यांनी व्यक्त केली.
या विधेयकामुळे समाजात शांतता निर्माण होण्याऐवजी तेढ निर्माण होऊ शकेल,
अशीही भीती वारकरी संप्रदायाच्या काही ज्येष्ठांनी व्यक्त केली आहे. हे
विधेयक आणण्यापूर्वी गेल्या विधेयकाच्या वेळी लोकांनी नोंदविलेल्या
आक्षेपांचा सरकारने विचार केला आहे का, असा सवाल करत आता उपमुख्यमंत्री
अजित पवार यांनी विधेयक मांडण्यापूर्वीच यातील कलम १३ काढण्याची घोषणा
केली आहे. ही घोषणा त्यांनी का केली? सरकारने जर अभ्यास करून हे विधेयक
आणले आहे तर कोणाशी चर्चा करून आता अजित पवार यांनी कलम १३ रद्द करण्याचे
जाहीर केले? हे १३ क्रमांकाचे कलम कोणी घातले, असे अनेक सवाल आता उपस्थित
केले जात आहेत.

हे विधेयक कोणत्याही परिस्थितीत मंजूर व्हावे, असा सरकारचा प्रयत्न आहे.
त्यासाठी वारकरी संप्रदायाचा विरोध नसल्याचे सरकारमधील काही
मंत्र्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र हे विधेयक येत्या अधिवेशनात
येणार, असे समजताच केवळ वारकरी संप्रदायच नव्हे तर विविध हिंदूू,
मुस्लीम, जैन, लिंगायत आदींचे प्रतिनिधी एकत्र येऊन त्यांनी या
विधेयकालाच विरोध केला आहे. औरंगाबाद येथे २४ जुलै रोजी या
विधेयकासंदर्भात सर्वधर्मीय व सर्वपंथीय सामाजिक परिषद भरविण्यात आली
होती. या परिषदेला ह.भ. प. बंडा तात्या कराडकर, ह.भ. प. नवनाथमहाराज
आंधळे, रामेश्वर शास्त्री, डॉ. रामकृष्णदास लहवीतकर, प्रकाश महाराज
जवंजाळ, डॉ. शेख इक्बाल मिन्न्ो, सय्यद पारनेर, बौद्ध भिक्खू
ज्ञानज्योती, बुद्ध पुत्र भन्तेजी, महानुभाव पंथाचे न्यायांबासबाब, महंत
संतोषमुनी शास्त्री, लिंगायत धर्माचे बसवलिंग देवरू, आर्य समाजाचे दयाराम
बसय्ये, हिंदू जनजागृती समितीचे माजी न्यायाधीश सुधाकर चपळगावकर व अ‍ॅड.
जयदेव श्यामकुंवर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्व
उपस्थितांनी एकमुखाने विधानसभेत सरकार मांडू इच्छित असलेल्या 'महाराष्ट्र
नरबळी व अन्य अमानवीय व अघोरी प्रथा व जादटोणा यांना प्रतिबंध व त्यांचे
समूळ उच्चाटन अधिनियम २०११' ला विरोध केला. शासनाने हे विधेयक विधिमंडळात
आणू नये, असा ठरावाही एकमताने मंजूर करण्यात आला.
राष्ट्रीय वारकरी सेनेचे अध्यक्ष ह.भ. प. निवृत्ती महाराज वक्ते यांच्या
म्हणण्यानुसार या विधेयकातील कलम दोनमधील 'क व ख' अन्वये दिंडीवाले
मठपती, महंत, संस्थाने, मंदिर समिती, नैमित्तिक उत्सव कमिटी आदी सर्वच
कारवाईस पात्र ठरतात. त्याचप्रमाणे महाराज लोकांना भोंदू ठरवून अटक करता
येऊ शक णार आहे. भूतखेत काढणारे अथवा नरबळी देणारे संस्था अथवा मठ स्थापन
करून हे उद्योग करत नाहीत, असे सांगून उद्या रामायण, महाभारत, भागवत
सांगणाऱ्या कीर्तनकार अथवा महाराजांना चमत्काराचा प्रसार अथवा
भोंदूगिरीला उत्तेजन देण्याच्या नावाखाली अटक होऊ शकेल. तसेच कलम २ मधील
(ड)मध्ये व्याख्या न केलेल्या शब्दांना, संज्ञांना औषधी आक्षेपार्ह,
जाहिराती अधिनियम १९५४ च्या संहितेत जे जे अर्थ नमूद केले ते ते अर्थ
लागू होतील, असेही नमूद केले आहे. वास्तविक अंधश्रद्धा निर्मूलनाच्या
कायद्याची काहीही गरज नाही, असे नमूद करून निवृत्ती महाराज वक्ते
म्हणतात, आयपीसी कलम ३०२, ३९९, २९९, ५०८, ४९७ व ४१७ हे कायदे नरबळी,
भोंदूगिरी, अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सक्षम आहेत. परंतु काही लोकांना
हिंदू संस्कृतीचाच दुस्वास असल्याकारणामुळे नरबळी, भुते, अघोरी विद्या हे
शब्द पुढे करून जुनेच विधेयक नव्या नावाने मांडण्यात येत आहे. वेद,
पुराणे तसेच हिंदू धर्मग्रंथांमध्ये हजारो मंत्र आहेत. याचा चमत्कार व
मानवी शक्तींशी संबंध असल्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलनाबाबतचे २०११चे
विधेयक मंजूर झाल्यास हिंदूंची जवळपास सर्वच ग्रंथसंपदा जप्त करावी
लागेल, असे पंढरपूरच्या निवृत्ती महाराजांनी मुख्यमंत्र्यांना आणि
उपमुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच सरकारने
बहुमताच्या जोरावर हा कायदा केल्यास त्याच्याविरोधात न्यायालयाचे दरवाजे
ठोठाविण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

आयपीसी कलम ३०२, ३९९, २९९, ५०८, ४९७ व ४१७ हे कायदे नरबळी, भोंदूगिरी,
अंधश्रद्धा निर्मूलनासाठी सक्षम आहेत. परंतु काही लोकांना हिंदू
संस्कृतीचाच दुस्वास असल्याकारणामुळे नरबळी, भुते, अघोरी विद्या हे शब्द
पुढे करून जुनेच विधेयक नव्या नावाने मांडण्यात येत आहे.

हिंदू धर्म व हिंदू संस्कृती ही सर्वधर्मसमभाव जपणारी आहे.
दया-क्षमा-शांती हे ब्रीदवाक्य आहे. आत्मोद्धार अथवा आत्मकल्याण हे
जिवाचे अंतिम कर्तव्य मानणारा हिंदू धर्म आहे. आत्म्याचे परमात्म्याशी
मीलन, जिवा-शिवाची गाठभेट हा जीवनप्रवाह हिंदू धर्माचा आहे.
ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायात ज्ञानेश्वरमहाराज म्हणतात, साधनेच्या
माध्यमातून साधकाच्या अतिंद्रिय शक्ती जागृत होऊन त्याला मुंगीच्या मनात
काय आहे तेही ओळखू येते, असे सांगून वारकरी संप्रदायाचे अग्रणी रामेश्वर
शास्त्री म्हणाले की, ''उद्या जर एखाद्या साधकाला अशी अतिंद्रिय शक्ती
प्राप्त झाली व त्याने अन्य कोणाच्या मनातले विचार ओळखले तर त्याच्यावरही
या कायद्यानुसार कारवाई होऊ शकेल. या कायद्यातील केवळ एखादे कलम नव्हे तर
संपूर्ण कायदाच आम्हाला मान्य नाही, असे सांगून याविरोधात सारा वारकरी
संप्रदाय तसेच विविध पंथ व संप्रदाय एकत्रितपणे लढा देतील. हिंदू
धर्मावरच नव्हे तर अन्य धर्मीयांच्या भावनांशी खेळ करणारे हे विधेयक
सरकारने मांडू नये, एवढीच आमची त्यांना विनंती आहे,'' असेही रामेश्वर
शास्त्री म्हणाले. अंधश्रद्धा निर्मूलनाच्या नावाखाली येऊ घातलेल्या
विधेयकाला प्रचंड विरोध असताना सरकार अट्टहासाने हे विधेयक का आणू पाहत
आहे, हाही यक्षप्रश्नच आहे.
lokprabha@expressindia.com






--
visit @
http://divyamarathi.bhaskar.com/
www.psiddharam.blogspot.com