Sunday, May 9, 2010

मुंबईत 90 हजार पाकिस्तानी

मुंबईत 90 हजार अवैध पाकिस्तानी राहतात. ही संख्या अधिकही असू शकेल, कमी नाही. मुंबई महानगरपालिकेकडून प्रकाशित कागदपत्रानुसार मुंबईत किमान 90 हजार पाकिस्तानी सुखा-समाधानाने राहत आहेत. इतकी मोठी संख्या मुंबईत पंजाब, हरियाणा आणि गोवा येथून आलेल्यांचीही नाही. ही खळबळजनक आकडेवारी मुंबई महानगरपालिकेने 2009 च्या डिसेंबर महिन्यात प्रकाशित केलेल्या मानव विकास अहवालात उपलब्ध आहे.
भारतातील सर्वात मोठ्या महानगरात आम्ही राहतो, याचा मुंबईकरांना मोठा अभिमान असतो. बॉलिवूड नगरी, भारतातील महान औद्योगिक शहर या शब्दांत मुंबईचे वर्णन केले जाते. तसे पाहिले तर मुंबईची विशेषता अनेक क्षेत्रांशी निगडित आहे, परंतु मुंबईकरांना कुठे माहीत आहे की, त्यांच्या पुढे-मागे, वर-खाली अख्ख्या मुंबईला हादरवून सोडू शकतील असे अपराधीही राहतात?
26 नोव्हेंबरच्या घटनेआधी किती पापी मुंबईत येऊन गेले हे कुणाला माहीत आहे? या सुंदर शहराला उद्‌ध्वस्त करण्याचे कारस्थान रचण्यासाठी ते येथे किती दिवस राहिले याची तरी कोणाला माहिती आहे? सामान्य लोकांच्या सुखी जीवनावर आघात करून त्याची राखरांगोळी करणारे या शहरात वावरताहेत हे तरी किती जणांना ठाऊक होते?
भारताचे तुकडे होऊन पाकिस्तान बनले तेव्हापासून भारत फाळणीच्या वेदना सहन करीत आहे. मुंबई आजही या वेदनेने विव्हळताना दिसते. पाकिस्तान उगवल्यानंतर तेथील लेखक कवींनी दिल्ली, लखनौ आणि कोलकाता या शहरांपेक्षा मुंबईवर लेखणी झिजवल्याचे दिसून येते. आपल्या जीवनात एकदा तरी मुंबईत यावे असे प्रत्येक पाकिस्तानी व्यक्तीची इच्छा असते, कधी व्यापारी बनून, कधी फिल्मी हस्ती बनून, तर कधी अतिरेकी बनून. असे नसते तर भारतीय शहरांपैकी मुंबईतच सर्वाधिक अवैध पाकिस्तानी राहिले नसते.
वेगवेगळी निमित्ते शोधून पाकिस्तानी मुंबईत येत असतात. काही इकडे तिकडे फिरून परततात. काही मुंबादेवीच्या या नगरीला उद्‌ध्वस्त करण्याचे मनसुबे ठेवून येथेच राहतात. मुंबई पोलीस त्यांचा शोध घेतात, पण त्याचा काहीही उपयोग होत नाही. मुंबईत बाहेरून येऊन जेवढे लोक मिसळतात त्यात सर्वाधिक संख्या पाकिस्तानी आणि बांगलादेशींची आहे.
भारतात भारत-पाक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन होते तेव्हा पाकिस्तान्यांना भारतात घुसण्याची खूप मोठी संधी वाटते. गेल्या वेळी अशाच स्पर्धांच्या वेळी भारत सरकारने पाच हजार पाकिस्तानी लोकांना भारतात येण्यासाठी पारपत्र दिले होते. त्यातून 1700 लोक आता तीन वर्षे होऊनही अद्याप पाकिस्तानला परतले नाहीत. भारत सरकार शोधून शोधून थकले, मात्र त्यांचा ठावठिकाणा काही लागला नाही.
अशा संधी वर्षातून दोन-चारदा येतातच. क्रिकेट आणि चित्रपट हे पाकिस्तान्यांसाठी भारतात घुसण्याची प्रमुख माध्यमे आहेत. आता राजस्थानच्या मुनाबव स्टेशनवरून चालणारी रेल्वे, धडाक्यात सुरू असणाऱ्या बसगाड्या यांमुळे भारतात येणे कठीण नाही. पाकिस्तानातून येणाऱ्या बसमध्ये बसायलाही जागा नसते, मात्र दिल्लीहून परतणाऱ्या गाड्या जवळजवळ रिकाम्या धावतात. पाकिस्तानातून भारतात सर्वांनाच यायचे असते, परंतु भारतातून आपल्या शहराला, गावाला परतायची इच्छा मात्र कोणालाच नसते. याचे काय कारण असावे बरे!
मागील काही वर्षांपासून मुंबईत अतिरेकी कारवाया वाढल्या आहेत. त्यामुळे पाकिस्तान्यांची मुंबईतील संख्या कमी झाली आहे, परंतु समाधान व्यक्त करण्याइतकी ती कमी झालेली नाही. मुंबईच्या 1 कोटी 19 लाख 78 हजार 450 इतक्या लोकसंख्येत 89 हजार 838 इतके पाकिस्तानी आहेत. म्हणजेच जवळजवळ 1 प्रतिशत लोकसंख्या पाकिस्तानी आहे. कोणी म्हणेल ही संख्या तर खूपच नगण्य आहे, परंतु विषाचा एक कणदेखील आपला नाश करू शकतो हे विसरून चालणार नाही. येथे प्रस्तुत केलेली आकडेवारी ही 2001 सालच्या जनगणनेवर आधारित आहे. मे 2011 मध्ये जनगणना सुरू होईल. तेव्हा कळून येईल की, मुंबादेवीच्या नगरातील पाकिस्तानी वाढले की कमी झाले?
मुंबई महानगरपालिकेने 2007 साली टाटा सामाजिक विज्ञान संस्थेकडून प्रकाशित एका सर्व्हेक्षणाचा आधार घेऊन ही आकडेवारी प्रकाशित केली. कोणतीही राजकीय विचारधारा असलेली व्यक्ती टाटा सोशल सायन्स संस्थेकडे अविश्वासाने पाहात नाही. ही संस्था अत्यंत विश्वसनीय आहे. टाटा सोशल सायन्स संस्थेने प्रकाशित केलेली आकडेवारी पाहा... 1961 साली मुंबईच्या लोकसंख्येत 4.17 टक्के लोक पाकिस्तानी होते. 1971 मध्ये 3.05 टक्के, 1981 मध्ये 2.06 टक्के आणि 1991 मध्ये 1.32 टक्के होते.
आता 2001 मध्ये ही आकडेवारी कमी होऊन 1 वर आली आहे. एक पाकिस्तानीही भारतासाठी धोका ठरू शकतो, मुंबईत तर 1 टक्के लोक पाकिस्तानी आहेत. ही खूप मोठी संख्या आहे.
महानगराच्या पोलीस व्यवस्थेत विदेशी नागरिकांशी संबंधित एक स्वतंत्र विभाग आहे. या विभागाकडे सर्व प्रकारची माहिती असते. मुंबई पोलीस विभाग वरील आकडेवारीला मान्यता देत नाही. बांगलादेशींच्या संबंधातही जेव्हा चर्चा सुरू असते, तेव्हाही मुंबई पोलीस मौन असतात, परंतु जेव्हा मतदार याद्यांतून लोक बांगलादेशी आणि पाकिस्तान्यांना ओळखतात तेव्हाही पोलीस व्यवस्था मौनच असते, हे चिंताजनक आहे.
केंद्र आणि महाराष्ट्र सरकारही आकडेवारी सार्वजनिक करू इच्छित नाही, परंतु आता माहितीच्या अधिकाराखाली त्यांना ही माहिती द्यावीच लागेल. साऱ्या जगाला माहीत आहे की, मुंबई महापालिकेत दोन वॉर्ड असे आहेत की, जेथे नगरसेवक विजयी होणे अथवा पराभूत होणे हे पाक आणि बांगलादेशींवर अवलंबून आहे.
टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने या संबंधीची माहिती प्रामाणिकपणे उपलब्ध केली, याबद्दल मुंबई महानगरपालिका आभारी आहे. सरकार कानाडोळा करते त्यामुळे परदेशात बसून भारतात अतिरेकी कारवाया चालविणारे सहजपणे भारतात स्लीपर सेल तयार करण्यात यशस्वी होतात. बाहेरून आलेल्या अतिरेक्यांना जोवर आतून समर्थन मिळत नाही, तोवर त्यांच्या कारवाया यशस्वी होऊच शकत नाही. जगात अनेक देशांत अतिरेकी कारवाया सुरू आहेत, परंतु भारतात आतून समर्थन मिळविणे अतिरेक्यांसाठी खूपच सोपे आहे.
सीमी आणि इंडियन मुजाहिद्दीन भारत सरकारसाठी डोकेदुखी बनले आहेत. या अतिरेकी संघटनांसाठी महानगर मुंबई म्हणजे एक सुरक्षित किल्लाच. 1993 चे बॉंबस्फोट असू देत की, 26/11 ची घटना, देशद्रोही तत्त्वांचा सक्रिय सहभाग राहिला आहे.
या देशद्रोही तत्त्वांना मुंबईत आर्थिक सहाय्यही सहजतेने होते. मुंबई हे शहर हवाला रॅकेटसाठीही कुप्रसिद्ध आहे. मुंबईच्या सागरी सीमा पळून जायला सोईच्या आहेत. महाराष्ट्राला जवळपास 750 किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. इतका मोठा सागरकिनारा मुंबईवर हल्ला करण्यासाठी आत आणि बाहेर लपलेल्या पाकिस्तान्यांसाठी सोयीचे आहे. भारताचे शत्रू मुंबईवर हल्ला करण्यासाठी जणु टपूनच बसलेले असतात.
अवैध पाकिस्तानी विविध मार्गांनी मुंबईत घुसतात. भारत आणि पाकिस्तानदरम्यान सरळ सरळ तीन लढाया झाल्या. या काळात पोलीस विभागाने सर्वाधिक पाकिस्तानी मुंबईतूनच पकडले होते. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबई शहर भारताच्या शत्रूंसाठी एक केंद्र बनल्याचे दिसते. पाकिस्तान्यांना शोधून काढणे खूप कठीण असले तरी यांना पकडून जोपर्यंत त्यांच्या देशात ढकलून देण्यात येणार नाही तोपर्यंत मुंबई आणि भारत सुरक्षित राहू शकणार नाही.
अनुवाद : सिद्धाराम भै. पाटील

No comments:

Post a Comment